महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांन वेधलं Urban Naxal मुद्द्याकडं लक्ष

विदर्भ प्रांत ABVP अधिवेशनात कॉलेज कॅम्पसबाबत चिंता

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादावर थेट हल्ला चढवत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कॅम्पसचा वापर करून देशात अराजकता पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे म्हटले.

देशातील माओवाद आणि नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला असला तरी आता शहरी नक्षलवादाची नवी डोकेदुखी निर्माण झाल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कॅम्पसचा वापर करून देशात अराजकता पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, बंदुकधारी नक्षलवाद्यांना नियंत्रणात आणण्यात केंद्र आणि राज्य सरकारला मोठे यश मिळाले आहे. मात्र, आता काही शक्ती संविधानावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी तरुण विद्यार्थ्यांचा वापर होतोय, असे त्यांनी नमूद केले.

नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा

देशभक्तीचा लढा उभारावा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशभक्त विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या नव्या शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, एकेकाळी काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची मुभा नव्हती, मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ते करून दाखवले. आजही देशभक्त तरुणांनी संविधान आणि राष्ट्रीय संस्थांवर असलेला विश्वास जपण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आहे. मात्र, काही शक्ती या संकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याची मागणी केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, या मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करेल.

डबल इंजिन सरकारमुळं Local Body Election मधील मार्ग सोपा

शहरी नक्षलवाद संपवणार

मुख्यमंत्र्यांनी न्यायालय, संसद, विधानसभा यांसारख्या संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, विरोधक आता देशातील वातावरण दूषित करण्यासाठी तरुण विद्यार्थ्यांचा गैरवापर करत आहेत. या षड्यंत्राला हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी ताकदीने उभे राहण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सांगितले की, देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न विरोधकांमार्फत होत आहेत. या नव्या शहरी नक्षलवादाला थोपवण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करेल. विद्यार्थ्यांना आवाहन करताना फडणवीस यांनी सांगितले की, आपण देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. संविधान आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सजग राहायला हवे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!