महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी ओलांडली अज्ञानाची सीमा

Supreme Court : मुख्यमंत्र्यांचे राहुल गांधींवर अप्रत्यक्ष वज्राघात 

Author

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणं हे केवळ ऐतिहासिक अज्ञानाचं लक्षण आहे. अशा विधानांनी अज्ञानाची मर्यादा ओलांडली असून, आता सत्याला न्यायालयाचं बळ मिळालं आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे योगदान हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अढळ स्थान राखून आहे. अशा या थोर क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना फटकारले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना काही लोक ‘माफीवीर’ म्हणतात, ही केवळ अज्ञानाची परिसीमा आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अशा वक्तव्यांवर कठोर भूमिका घेतल्याने मी न्यायालयाचे आभार मानतो. ‘पुन्हा असे बोलाल तर शिक्षा करू’ अशी ताकीद देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक होतं, असं सांगत फडणवीसांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना चांगलंच लक्षात आणून दिलं.

फडणवीस यांचा घणाघात

फडणवीस पुढे म्हणाले, सावरकर अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असह्य अशा अमानुष परिस्थितीतही खंबीर राहिले. अनेक कैद्यांमध्ये नैराश्य असताना, सावरकर इतरांना धीर देत, त्यांना अर्ज लिहिण्याची मदत करत होते. त्यांनी कधीही स्वतःसाठी केवळ सूट मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. पण दुर्दैवाने काही मूर्ख लोक अजूनही त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करत आहेत.

Pravin Datke : धागा धाग्याने गुंफला संघर्ष, अखेर न्यायाची वीण बसली

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि हिंदुत्वाचा तेजस्वी विचार जर जनमानसात पोहोचला, तर काही लोकांची राजकीय गणितं ढासळतील, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच ते त्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करतात. पण हे बोलणे केवळ बालबोध असून, जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे. सत्य कितीही लपवले तरी ते समोर येतेच.

मराठी भाषेचा अभिमान

सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक विचारवंत, साहित्यिक आणि भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते होते, असे सांगत फडणवीस म्हणाले, त्यांचे हिंदुत्व हे विज्ञाननिष्ठ होते. ते एक व्यक्ती नव्हते, तर एक संस्था होते. त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

फडणवीसांनी सावरकरांच्या मराठी भाषा समृद्धीतील योगदानाचीही आठवण करून दिली. “विधिमंडळ, चित्रपट, निवृत्तीवेतन यांसारखे शब्द मराठीत रूढ करून त्यांनी भाषेचे संमेलन अधिक सशक्त केले. मराठी भाषा प्रमाण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या भाषाशुद्धी मोहिमेमुळे आजची मराठी अधिक शुद्ध व समृद्ध आहे, असे ते म्हणाले.

Nagpur Riots : मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला

या सर्व वक्तव्यांचे औचित्य होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची स्मृती जपण्याची आणि त्यांच्या विचारांची मशाल पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

इतिहासाला विकृत करणाऱ्या शक्तींना आता न्यायालयानेच उत्तर दिले आहे. सत्य लपवता येत नाही. सावरकर हे आमच्या अभिमानाचे प्रतीक आहेत, आणि त्यांच्या कार्यावर गर्व करण्यास आम्ही कधीही मागे हटणार नाही, अशा ठाम शब्दांत फडणवीसांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!