महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम 

Ashish Deshmukh : फर्टीलायझर कॉम्प्लेक्सचा भव्य प्रकल्प उंबरठ्यावर

Author

नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याचा चेहरा बदलणाऱ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी हालचालींना वेग आला आहे. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत या प्रकल्पाला ठोस सकारात्मक दिशा मिळाली आहे.

नागपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असलेल्या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सध्या मोठी हालचाल सुरू आहे. सावनेर-कळमेश्वरचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन नागपूरमध्ये इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स स्थापन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडला. विशेष म्हणजे, या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर ठाम आणि सकारात्मक होते.

हे प्रकल्प जर प्रत्यक्षात आले, तर नागपूर जिल्ह्याची ओळख केवळ शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणूनच नव्हे, तर भारताच्या खत उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य औद्योगिक हब म्हणून होऊ शकते. या बैठकीत डॉ. देशमुख यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि सखोल अभ्यास स्पष्ट जाणवत होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, ओडिशा राज्याला जाणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन नागपूर जिल्ह्याच्या मार्गाने जाते. याच गॅसच्या माध्यमातून एक भव्य केमिकल आणि फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारता येऊ शकतो.

औद्योगिक क्रांती

सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) या देशातील अग्रगण्य कंपनीने या प्रकल्पात स्वारस्य दाखवले आहे. गेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग हा या प्रकल्पाच्या व्यवहार्यता आणि गांभीर्याचा ठोस पुरावा आहे. हा फक्त एक कारखाना नसेल, तर एक संपूर्ण औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू असेल.

Teacher’s Rights : शिक्षकांच्या संघर्षाला मिळालं मंत्रालयात बळ

डॉ. आशिष देशमुख यांच्या मते, या प्रकल्पामध्ये केवळ युरिया नाही, तर शेतीसाठी आवश्यक असलेले अनेक पदार्थ तयार होतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि गावोगावी आर्थिक घडी स्थिर बसेल. या प्रकल्पाच्या इकोसिस्टममधून होणारी रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणात असेल – स्थानिक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. गावखेड्यांतून शहरांकडे होणं स्थलांतर कमी होईल आणि गावं रोजगाराच्या संधींनी फुलून जातील.

अशेची किरणरेषा

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या आहेत. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या महत्त्वाच्या बैठकीस राजीव सिंघल यांच्यासह अनुभवी उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्रकल्पाबाबतचे सविस्तर निवेदनही यावेळी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा प्रकल्प केवळ एक औद्योगिक यंत्रणा नसून, संपूर्ण विदर्भाच्या विकासाचा स्पार्क ठरणार आहे. शेतकरी, तरुण, उद्योजक आणि सर्वसामान्य नागपूरकरांसाठी ही एक नवीन आशेची किरणरेषा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!