महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही

Chhatrapati Shivaji Maharaj: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतापले

Author

देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस स्वयंसेवकांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप आणि संघ परिवारावर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवीन वादंग पेटलेला आहे. “कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच विराजमान झालेले हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय बाजारात चांगलेच फिरत आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी केली, आणि त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएस स्वयंसेवक हे महाराजांच्या नखाइतकेही नाहीत, असे ते म्हणाले आहेत.

सपकाळ यांचे म्हणणे आहे की, शिवाजी महाराजांचे मावळे आणि संघ स्वयंसेवक यांची तुलना करणे म्हणजे थेट इतिहासाचा अपमान आहे. शिवरायांचे मावळे हे कोणत्याही जातीधर्माच्या चौकटीत बसणारे नव्हते, ते स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारे खरे लढवय्ये होते. परंतु, आरएसएसच्या विचारसरणीने ऐतिहासिक सत्यावर सातत्याने गढूळ पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिवरायांच्या प्रतिमेवरच कब्जा मिळवायचा आहे का.

Eknath Shinde: जहाँ है नाना, वहाँ नही जाना….

 

विचारसरणीवर आरोप

सपकाळ यांनी असेही म्हटले आहे की, इतिहासाने सिद्ध केले आहे की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे विरोधक होते, त्याच विचारांचे वारस आज आरएसएसमध्ये दिसतात. इतिहासात वारंवार आढळून येते की, संघाच्या विचारसरणीने शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी महाराजांना धार्मिक चौकटीत बसवून त्यांचा इतिहास अपमानित करण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला आहे. मग, हेच विचार असलेले लोक आता मावळ्यांची तुलना स्वयंसेवकांशी करत असतील, तर त्याला काय म्हणायचे.

सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, जिरेटोप हा शिवरायांचा एक महत्त्वाचा प्रतीक आहे. मात्र, आरएसएस तो देखील आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. इतिहासकारांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, संघाच्या विचारसरणीने छत्रपतींच्या प्रतिमेला नवा चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा विषय केवळ राजकीय नाही, तर तो महाराजांच्या वारशावर चाललेला घाला आहे.

Marathi Sahitya Sammelan : अभिजात मायेच्या व्यासपीठावर ‘मिल बैठे दो यार’

दोन कोटींचा भ्रष्टाचार

मागील वर्षी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा कोसळल्याची घटनाही समोर आली होती. केवळ काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचे भव्य अनावरण केले होते, आणि तोच पुतळा जमीनदोस्त झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर भाजप-शिंदे सरकार अडचणीत आले असून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते.

पुतळ्यासाठी तब्बल 2.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. भारतीय नौदलाने उभारलेल्या या पुतळ्याचे काम आर्टिसरी कंपनीला देण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल सुरू असून, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी हा प्रकार म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला होता. सरकारी अधिकाऱ्यांची मिलीभगत, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, आणि ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारावर कुणाचा अंकुश नव्हता का? असे सवाल उपस्थित होत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारण्यात आलेला हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि दूरदृष्टीचा प्रतीक मानला जातो. पण जर महाराजांचे नावही भ्रष्टाचाराच्या खेळात वापरले जात असेल, तर हा अपमान महाराष्ट्र सहन करणार का हा मुद्दा चांगलाच पेटला होता.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!