महाराष्ट्र

मुख्यमंत्री म्हणून असं काम करणार Devendra Fadnavis

राज्याला सांगितला Maharashtra Government मधील कामाचा रोडमॅप

Share:

Author

Views: 34517

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला कामाचा रोडमॅप सांगितला आहे. कसं काम केलं जाईल, याबद्दलची माहिती त्यांनी महाराष्ट्राला दिली.

राज्याच्या घडामोडी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा बोलबाला आहे. आपल्या नागपूर दौऱ्यात त्यांनी राज्यातील विविध विकास योजनांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात यापुढच्या योजना कशा असतील हे त्यांनी सांगितलं. राज्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयाचे महत्त्व त्यांनी सांगितलं. विजयासोबत आलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या बोलण्यात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. बहुमताचा कौल जबाबदारीसह येतो त्यासोबत जबाबदारी देखील येते. राज्याच्या विकासाची दिशा ठरवली जाऊ शकते. काही अडचणी आणि मर्यादा येऊ शकतात. पण अशातही जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्वप्नातलं घरासाठी Chandrashekhar Bawankule ठेवणार वाळूचे दर नियंत्रणात

Ladki Bahin होणार गतीमान

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी असलेल्या धोरणांची माहिती दिली. डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. योजनेची आर्थिक स्थिती, कार्यप्रणाली यावर त्यांनी मत व्यक्त केलं. महिला सशक्तीकरणासाठी ही योजना गरजेची असल्याचं ते म्हणाले. अडीच वर्षांत ऊर्जा, जल आणि इतर विभागांमध्ये महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झालेत. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्याच्या विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून गरीब, महिला आणि दुर्बल घटकांसाठी निर्णय घेत राहणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, पंतप्रधान आवास योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश यात राहणार आहे. गरीब आणि दुर्बल घटकाला सरकार सक्षम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

अनुभव अन् CM पद

फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या दिवसांवरही संवाद साधला. 2014 ते प्रथम मुख्यमंत्री झाले. तेव्हा अनेकांना त्यांच्यावर शंका होती, असं ते म्हणाले. काही लोकांना वाटायचं की, त्यांच्याजवळ अनुभव कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांमध्ये तर अशी शंका होती की, विदर्भासाठी आवाज उठवणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला. त्यामुळं त्यांच्या क्षेत्रावर अन्याय होईल. आपण या शंका दूर केल्या. विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच काम केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

विदर्भासाठी केलेल्या 80 सिंचन प्रकल्पांचे काम आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासाठीही अनेक प्रकल्प सुरू केले. प्रत्येक भागाच्या विकासासाठी समान लक्ष दिलं. योजनांचा सुयोग्य वापर करण्यात आला. यश मिळालं तरी डोक्यात कधीच सत्ता जाणार नाही. राजकारणात कधीच सत्तेतून वर्चस्व राखण्याची इच्छा नाही. आपण पदाला सेवेची संधी म्हणून पाहतो. सत्ता जनतेच्या सेवेसाठी असावी. फडणवीस म्हणाले, पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार चालवण्यावर जोर राहणार आहे. राजकारणात विविध आव्हानं येतात. परंतु प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करीत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला सकारात्मक आणि प्रगल्भ अनुभव मिळत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!