
2025 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2025 वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि शेती क्षेत्राला दिलासा देणाऱ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार केला असून महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही, यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. यामुळे त्यांच्याकडे जास्त डिस्पोजेबल उत्पन्न राहील, ज्याचा फायदा देशाच्या एमएसएमई क्षेत्राला होणार आहे.

Shiv Sena UBT: पक्षाला लागलेल्या गळतीला थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल
शेती मासेमारीला चालना
या अर्थसंकल्पात 100 जिल्ह्यांमध्ये शेती विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तेलबियांच्या 100% खरेदीसाठी केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. मासेमारी करणाऱ्यांसाठी क्रेडिट मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. आता स्टार्टअपसाठी क्रेडिट मर्यादा 10 कोटींवरून 20 कोटींवर नेण्यात आली आहे. यामुळे नवउद्योजकांना मोठ्या संधी उपलब्ध होतील.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी पीपीपी (Public-Private Partnership) प्रकल्पांसाठी नवीन योजना सादर करण्यात आली आहे. यामुळे खाजगी गुंतवणुकीला चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
अच्छे दिन, बिहारची निवडणूक अन् Nirmala Sitharaman यांची मधुबनी
मध्यमवर्गीयांसाठी सुखद बातमी
फडणवीस म्हणाले, हा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल. मध्यमवर्गीयांसाठी हा ड्रीम बजेट आहे. कर सवलतीमुळे त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या अर्थसंकल्पाने देशातील अर्थव्यवस्थेसाठी नवीन दिशा दिली असून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणाऱ्या योजनांचे स्वागत करण्यात आले आहे.