
परभणी येथे घडलेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक याबाबत चर्चेची मागणी करीत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, 20 डिसेंबरला Vidhan Sabha मध्ये परभणी आणि बीड घडलेल्या घटनेप्रकरणी निवेदन केलं. परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर परभणीत हिंसाचार झाला होता. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. परभणीमध्ये अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यावरून सध्या महाविकास आघाडीनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेसंदर्भात निवेदन देताना या संपूर्ण घटनेची माहिती सभागृहात दिली.
परभणीत झालेल्या तोडफोडीत तब्बल 1 कोटी 89 लाख 54 हजारांचं नुकसान झाल्याचं मुख्यंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप झाला होता. घोरबांड यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. परभणीत 11 डिसेंबर रोजी बंद पुकारला होता. त्यानंतर हिंसाचार झाला होता.

परिस्थिती Control मध्ये
गंगाखेड रोडसह काही ठिकाणी आधी टॉवर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे 500 आंदोलनकांनी एकत्र येत तोडफोड केली. जमावाने बंद असलेल्या दुकानांची देखील तोडफोड केली. वाहनांना जाळण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी जमावबंदी लागू केली. परिस्थिती नियंत्रणात न आल्यानं अश्रुधुराचा वापर करण्यात आला. लाठीचार्ज करण्यात आला. काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश करत काचा फोडल्या, खुर्च्या तोडल्या. त्यानंतर सीआरपीएफची जास्त तुकडी बोलावण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचं फडणवीस म्हणाले.
दंगलप्रकरणी 51 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये 41 व्यक्तींना तीन गुन्ह्यांत अटक करण्यात आली. महिलांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना फक्त नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. सायंकाळी सहानंतर कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हिडीओमध्ये जे तोडफोड करताना दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परभणीत ज्यानं विटंबना केली तो मनोरुग्ण आहे. त्याच्यावर 2012 पासून उपचार सुरू आहेत. तरीही तो आरोपी खरच मनोरुग्ण आहे की नाही त्यासाठी चार डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी त्याची तपासणी केली.
Combing Operation नाही
परभणीत पोलिसांनी कोणतेही कोम्बिंग ऑपरेशन केलेलं नाही. एक तक्रार दाखल झाली होती. त्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवी पेक्षा जास्त बळाचा वापर केला. या आरोपानंतर चौकशी केली जाईल. कल्याण येथील मारहाण प्रकरणावरूनही विधिमंडळात पडसाद उमटले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या झाली. परभणी येथील प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांचे आभार मानले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट टाकत फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.