
भर पावसात शेतातील चिखल पायदळी तुडवत भात रोवणी करणारे आयएएस विनय गौडा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. विदर्भातील महत्वाचं शहर असलेल्या चंद्रपूरचे कलेक्टर म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. गौडा आता पुन्हा मैदानात उतरले आहेत. शंभर दिवसांच्या ‘अॅक्शन प्लान’सह.
काळ्या हिऱ्याची खाण अर्थात कोळशाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर प्रसिद्ध आहे. राज्याला ऊर्जा देणारा जिल्हा म्हणुनही चंद्रपूरची ओळख आहे. वाघांची राजधानी असलेल्या या जिल्ह्याची प्रशासकीय जबाबदारी सध्या आयएएस अधिकारी विनय गौडा यांच्याकडं आहे. भर पावसात धानाच्या शेतात चिखल तुडवत भात रोवणी करणारे विनय गौडा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आता हेच गौडा पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. शंभर दिवसांच्या ‘अॅक्शन प्लान’सह.
सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक विभागाचा शंभर दिवसाचा आराखडा तयार करीत आहेत. शंभर दिवसात काय करायचं हे सरकारनं ठरविलं आहे. सरकार प्रमाणंच आता प्रशासकीय यंत्राही शंभर दिवसाचा आराखडा तयार करून काम करीत आहे. त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे देखील कामाला लागले आहेत. गौडा यांनी यादरम्यान चिमुकल्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. कळमना येथेही त्यांनी भेट दिली. या भेटीने शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला सशक्त विकासाची आशा दिली. प्रशासन खऱ्या अर्थानं दारी आल्याची प्रचिती यातून अनेकांना आली.

पायाला भिंगरी
चंद्रपुरात काम करताना विनय गौडा यांनी पायाला भिंगरी लावत काम केलं. दिवसरात्र एक केला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचं सहसा पटत नाही, असं चित्र बघायला मिळतं. पण गौडा यांनी हा समन्वय साधत चंद्रपूरमध्ये काम करून दाखविलं. प्रशासकीय अधिकारी कसे ‘विनय’पूर्ण असावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आता बाहेर पडल्यानंतर त्यांनी कळमन्यात शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधला. शाळांमधील शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक योजनेबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांना ‘फार्मर आयडी’ तयार करण्याचं महत्त्व पटवून दिलं.
गौडा यांच्या संवादाचा असा काही प्रभाव पडला की शेतकऱ्यांनी विविध कृषी योजनांचा लाभ घेतल्याचा ठराव झाला. शेतकऱ्यांना कर्जवितरण सुलभ करणारी यंत्रणा उभारण्याची सूचना त्यांनी केली. कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारी पद्धत निर्माण करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. सौरग्राम योजनेचा आढावा घेतला. इतर उपक्रमांबाबतही सकारात्मकपणे पुढाकार घेतला.
दिसली सुंदर माझी शाळा
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमधील शाळा सुंदर झाल्या आहेत. त्यांची पाहणी देखील गौडा यांनी केली. चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांनी गुरूजन कसे शिकवतात याचा कानोसा घेतला. शालेय शिक्षण विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची सद्य:स्थिती देखील गौडा यांनी जाणून घेतली. शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणेबाबत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागावरही त्यांनी एकमत करून घेतलं. अलीकडच्या काळात शिक्षकांना अनेकदा शाळाबाह्य कामं करावी लागतात. त्यामुळं शिक्षकांवर कामाचा ताण पडतो. या विषयावर विनय गौडा यांनी शिक्षकांचं मनोबल उंचावलं. विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यात शिक्षकांचं अमूल्य महत्व त्यांनी सर्वांना पटवून दिलं.
हम चलते तो चिता के रफ्तार से चलते… ये किसान के बेटे का सीना है…
बळीराजाच आधार
विनय गौडा यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. ‘ॲग्री स्टॅक’ म्हणजे नेमकं काय हे शेतकऱ्यांना समाजावून सांगितलं. ‘फार्मर आयडी’ तयार केल्यानं कोणते फायदे होणार हे सर्वांना सांगितलं. ही आयडी मोफत कशी तयार करता येईल, याबद्दल स्वत: शेतकऱ्यांना सांगितलं. आधार कार्ड आणि आधार संलग्न मोबाइल क्रमांकामुळं होणाऱ्या फायद्यांबद्दल शेतकऱ्यांना सांगितलं. इतकंच नव्हे तर सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचाही सल्ला दिला.
सरकारी योजनेतून आता गावं सौरऊर्जामय होत आहेत. त्याबाबत गौडा यांनी ग्रामस्थांना अवगत केलं. प्रत्येक कुटुंबानं घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावं असं आवाहन केलं. त्यातून प्रत्येक घर कसं ऊर्जानिर्मिती करू शकेल हे त्यांनी दाखवलं. वीज बीलामध्ये बचतीमुळं आर्थिक संतुलन साधता येईल, हे देखील सांगितलं. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना कुटुंबांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेत. विनय गौडा यांच्या या पुढाकारानं चंद्रपुरातील ग्रामीण जनता पुन्हा एकदा प्रभावित झाली आहे.