महाराष्ट्र

Parinay Fuke : अधिवेशनातील आवाजाचे फळ बँक खात्यात दिसणार

Maharashtra : दिव्यांगांसाठी अर्थसहाय्यात बंपर वाढ

Author

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर ठोस आवाज उठवणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एका महत्त्वाच्या योजनेवर लक्षवेधी प्रस्ताव मांडला होता. त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्न आणि लक्षवेधी सूचनांनी वातावरण ढवळून निघाले होते. यामध्ये भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या खणखणीत आवाजात समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडले. विशेषत: दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी त्यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना आता फलद्रूप ठरली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार 500 ऐवजी 2 हजार 500 रुपये मिळणार आहेत. ही वाढ येत्या ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. डॉ. परिणय फुके, जे नेहमीच जनसामान्यांचा आवाज बनून शासनापर्यंत पोहोचतात, यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा निर्णय म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी खरा दिलासा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याला जनतेनेही दाद दिली आहे. कारण डॉ. फुके यांनी यापूर्वीही अनेक प्रश्न अधिवेशनात मांडून त्यांना यश मिळवून दिले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एक आधारस्तंभ आहे. योजनेअंतर्गत विधवा, निराधार पुरुष, गंभीर आजारी रुग्ण, तुरुंगातील कैद्यांची कुटुंबे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आणि विशेषत: 65 वर्षांखालील दिव्यांगांना आर्थिक मदत मिळते. याशिवाय, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेनेही अनेकांना आधार दिला आहे.

Nagpur Police : सीएमच्या मतदारसंघातील अजनीत फक्त आठ अधिकारी

यशस्वी योजनेची अंमलबजावणी

दोन्ही योजनांमधून मिळणारी मासिक मदत आता 2 हजार 500 रुपये झाली आहे. ही वाढीव रक्कम नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. हा निर्णय लाखो लाभार्थ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास आणणारा ठरेल. डॉ. परिणय फुके यांचे कार्य येथेच थांबत नाही. त्यांचा लोकांशी असलेला थेट संवाद आणि सामान्य माणसाच्या समस्यांप्रती संवेदनशीलता यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अधिवेशनात मांडलेल्या प्रत्येक लक्षवेधी सूचनेतून त्यांनी सरकारला जागृत केले आहे. मग तो रस्त्यांचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा असो किंवा दिव्यांगांच्या हक्कांचा. डॉ. फुके यांनी प्रत्येकवेळी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. या यशस्वी मागणीमुळे त्यांच्या कार्याची झळाळी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

डॉ. फुके यांच्या या प्रयत्नांमुळे लाखो दिव्यांगांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे. समाजातील माणूस जेव्हा सुखी होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास पूर्ण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे केवळ आर्थिक मदतच वाढली नाही, तर दिव्यांग बांधवांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारनेही तत्परता दाखवली आहे. ऑक्टोबरपासून लागू होणारी ही वाढ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. परिणय फुके यांच्या या प्रयत्नांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, खऱ्या नेत्याची ओळख ही लोकांच्या समस्या सोडवण्यातून होते. त्यांच्या कार्यामुळे समाजातील उपेक्षितांना आता नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Vijay Wadettiwar : सत्तेच्या लालसेत महाराष्ट्राचा सौदा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!