महाराष्ट्र

कलम 370, राम मंदिर, तीन तलाकचे कनेक्शन असलेले ज्ञानेश मोठ्या पदावर

पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वात झाली नियुक्ती 

Share:

Author

राजीव कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्ती झाली आहे. या पदावर आता ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतातील निवडणूक आयोग हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा कणा आहे. या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे जबाबदारीही तितकीच मोठी असते. राजीव कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध निवडणुकांनंतर आता देशाला नवा मुख्य निवडणूक आयुक्त मिळले आहे. त्यांच्या जागी आता ज्ञानेश कुमार हे पदभार स्वीकारतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार यांची भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेतील. ज्ञानेश कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील निवडणुकांचे पर्यवेक्षण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

आणखीनच होत आहे बिकट, Vidarbha येथील कृषी संकट

अनेक जबाबदाऱ्या

1988 मधील बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले ज्ञानेश कुमार हे गेल्या वर्षभरात निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्यावर देशातील महत्त्वाच्या निवडणुकांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी येणार आहे. विशेषतः बिहार विधानसभा निवडणुका आणि 2026 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील निवडणुकांचे ते पर्यवेक्षण करतील.

61 वर्षीय ज्ञानेश कुमार यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. केंद्रीय गृह मंत्रालयात असताना त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राम मंदिराशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील खटल्यातील दस्तऐवजांचे व्यवस्थापनही त्यांनी केले होते. नागरी सेवेत दीर्घकाळ कार्यरत राहिल्यानंतर ते सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते.

अनुभवाचा ठसा 

कानपूरच्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश कुमार यांनी बिझनेस फायनान्स आणि पर्यावरणीय अर्थशास्त्राचा अभ्यास हार्वर्ड विद्यापीठातून केला आहे. प्रशासकीय अनुभव आणि अकादमिक पार्श्वभूमी यांचा मेळ त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसून येतो.

भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व करणे हे आव्हानात्मक असते. राजीव कुमार यांच्या कारकीर्दीनंतर निवडणूक आयोगाचे नेतृत्व करणारे ज्ञानेश कुमार आता निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी कोणते नवीन दृष्टिकोन आणतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर सध्या ईव्हीएम (EVM) अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत मोठा वाद सुरू आहे. अनेक विरोधी पक्षांनी या यंत्रांवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे या वादळाचा सामना करण्यासाठी ज्ञानेश कुमार कोणतं इंजिनिअरिंग वापरतात ? या वादळाला ते कसं तोंड देतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!