महाराष्ट्र

Nagpur Riot : मुख्यमंत्र्यांनी कोणाचे डोळे काढले? काँग्रेसवर शिंदे संतप्त

Eknath Shinde : हर्षवर्धन सपकाळ यांनी मागावी माफी 

Author

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात नागपूर दंगल प्रकरणानंतर फडणवीस-औरंगजेब तुलना वादळ पेटलं आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र आक्रमक प्रतिक्रिया दिली.

राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या दंगलीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट सवाल केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेसाठी झटणारे नेते आहेत. त्यांनी कधी कोणाचा छळ केला? कोणाचे डोळे काढले? कोणाची चामडी सोलली? असे थेट सवाल महाविकास आघाडीला केले. मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी का? औरंगजेबाने शंभूराजांसह कित्येक हिंदवी स्वराज्याच्या वीरांचा छळ केला. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तुलना करणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी.

Nagpur Riots : मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल, अभिजीत वंजारी संतप्त

आयोजन ठरवून केलं का? 

नागपुरात नुकत्याच झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “मी स्वतः व्हिडीओ पाहिलेत, टीव्हीवर बातम्या पाहिल्या. लहान बाळं, महिला घाबरलेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली गेली. लोकांच्या घरांवर दगडफेक केली. इतकंच नाही तर रुग्णालयातील देवांचे फोटो जाळले गेले. एका पाच वर्षांच्या मुलाचा जीव जाता जाता वाचला. पोलिसांवरही कुऱ्हाडीने हल्ला झाला, डीसीपी लेव्हलचे अधिकारी जखमी झाले. एवढं सगळं अचानक घडलं का? शिंदे पुढे म्हणाले, मला माहिती मिळाली की जिथे नेहमी शंभर-दीडशे गाड्या पार्क होतात, त्या भागात एकही गाडी नव्हती. म्हणजे दंगल आधीपासूनच नियोजनबद्ध होती का, याचा विचार करायला हवा.

शिंदे यांनी आवाहन करताना स्पष्ट केलं की, “कोणत्याही गोष्टीचा विरोध करायचा असेल, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करा. आपल्या भावना शांततेत मांडाव्यात. पण कायदा हातात घेऊन, लोकांच्या घरांमध्ये दगडफेक करून, महिलांवर आणि मुलांवर अन्याय करणं योग्य नाही.”

विरोधकांना थेट इशारा

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी करताय. आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंग्याशी करताय, हे असं चालू द्यायचं का? तुमचे नेते कोणती भाषा वापरतात याकडे लक्ष द्या. हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!