महाराष्ट्र

महायुतीचे Jay & Veer पुन्हा दिसले सोबत

एकत्र प्रवासाची Devendra Fadnavis आणि Eknath Shinde यांनी लुटली मजा

Author

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

रुपेरी पडद्यावर शोले चित्रपटातील जय आणि विरूची जोडी चांगलीच गाजली. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच एका जय आणि विरूची जोडी गाजत आहे. ही जोडी आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची. शोलेमध्ये जय आणि वीरू हे एकाच वाहनानं प्रवास करायचे. असाच प्रवास पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे एकत्र करताना दिसले आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात शिंदे-फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं. त्यावेळी दोघांनी समृद्धीवरून प्रवास केला. या प्रवासात फडणवीस यांनी शिंदे यांचं सारथ्य केलं.

आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस एकत्र प्रवास करताना दिसले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत एका कार्यक्रमात शिंदे-फडणवीस एकत्र दिसले. योगायोग म्हणजे नागपुरातील प्रवासादरम्यान फडणवीस उपमुख्यमंत्री होते. मुंबईत प्रवासात मात्र ते मुख्यमंत्री म्हणून प्रवासात सहभागी होते. त्यामुळं फडणवीस कोणत्याही पदावर असले तरी महाराष्ट्रातील सत्तेचं स्टेअरिंग त्यांच्याच हातात असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

उद्धव ठाकरे गटाला धक्का; Rajul Patel शिंदे गटात सामील

राजकीय महाशक्ती

फडणवीस यांचं नेतृत्व आणि शिंदे यांचा सहकार्य ही महाराष्ट्रातील राजकीय महाशक्ती म्हणून ओळखली जात आहे. त्यांच्या ‘कनेक्शन’मुळे शिंदे-फडणवीस यांच्या जोडीनं एक नवा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. विविध विकासाचे प्रकल्प राबविले जात आहेत. अशाच एका प्रकल्पाचं फडणवीस-शिंदे यांनी लोकार्पण केलं. यावेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावरून प्रवास केला.

वरळी-वांद्रे सी-लिंकला जोडणाऱ्या नॉर्थ चॅनेल ब्रिजचेही उद्घाटन केले. हे दोन्ही प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. याप्रसंगी फडणवीस यांनी भारतातील लोकशाही, सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षतेला अधिक बळ देण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वाल्मिक कराड भाजपमध्ये जाणार? Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा

महत्वाची घोषणा

ध्वजारोहणानंतर फडणवीस यांनी प्रकल्पाचं लोकार्पण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी मुंबईमध्ये 70 हेक्टरचा एक मोठा पार्क बांधण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. या पार्कचा उद्देश मुंबईतील प्रदूषण कमी करणे आहे. लोकांना ऑक्सिजन पार्कच्या रूपात एक नवा आणि सुरक्षित ठिकाण उपलब्ध करणे आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवरील करार झाला आहे.

मुंबईत 300 एकर जागेवर एक जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क बांधला जाईल. हा पार्क मुंबईकरांसाठी मोठं योगदान ठरेल, असे शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा राजकीय समन्वय आणि त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे, महाराष्ट्राला समृद्धीसाठी एक मजबूत पाया मिळत आहे, असं आता बोललं जात आहे. आता मुंबईमध्ये होणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे राज्याच्या प्रगतीची दिशा स्पष्ट झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!