
वाघोली येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईची मोहिम राबवण्यात आली.
वाघोलीमधील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाघोली पोलिसांनी बुधवारी संयुक्त कारवाई करून सुमारे 40 हजार चौरस फूट अतिक्रमण हटवले. या मोहिमेत शेड, ओटे, फलक आणि बांधकामांचा समावेश होता. ही मोठी कारवाई अवघ्या सहा तासांत यशस्वीपणे पार पडली. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या वेळी आयुक्तांनी स्वखर्चाने चालत पाहणी करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी एक वाजता केसनंद फाटा येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

हम चलते तो चिता के रफ्तार से चलते… ये किसान के बेटे का सीना है…
ठोस पावले
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या शेड्स, फलक व ओट्यांवर सात तास चाललेल्या या मोहिमेत जेसीबी व सुमारे 50 बिगारींचा सहभाग होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात आले.
संध्याकाळपासूनच काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण काढून घेतले होते. या सकारात्मक प्रतिसादामुळे कारवाई शांततेत पार पडली. महापालिकेने नागरिकांना यापुढे अशी अतिक्रमणे टाळण्याचे आवाहन ‘अॅक्शन मोड’ कायम ठेवणारा अधिकारी केले आहे.
Dhananjay Munde राजीनामा प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांना सादर केले कागदपत्र
‘अॅक्शन मोड’ कायम ठेवणारा अधिकारी
बुलढाणा, नागपूर आणि अमरावती येथे कार्यकाळ गाजवणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातही कणखर नेतृत्व दाखवत गुंडांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता वाहतूक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची ही कृती शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या कारवाईचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. वाघोलीतील वाहनचालक व रहिवाशांनी वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
पुढील कारवाईची तयारी
महापालिकेने गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुढील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. नागरिकांनी वाहतुकीला अडथळा ठरणारे कोणतेही अतिक्रमण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाघोलीतील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही कारवाई दिलासा देणारी आहे. प्रशासनाची ही तात्काळ आणि प्रभावी कारवाई भविष्यातही वाघोलीच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.