
कर्नाटकातील बेळगाव येथे माजी आमदाराला रिक्षा चालकाने बेदम मारहाण केली. रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना माजी आमदाराचा झाला मृत्यू.
बेळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. गोव्याच्या फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा लॉजच्या पायऱ्यांवर कोसळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांना रिक्षाचालकाने बेदम मारहाण केली होती.
लहू मामलेदार कामानिमित्त बेळगावमध्ये आले होते. शिवानंद लॉजकडे जात असताना त्यांच्या कारचा एका रिक्षाला हलका स्पर्श झाला. नुकसान काहीच झाले नव्हते, त्यामुळे मामलेदार यांनी तत्काळ “सॉरी” म्हणत कार पुढे घेतली. पण रिक्षाचालक संतप्त झाला आणि त्यांचा पाठलाग करत लॉजपर्यंत पोहोचला.

बेदम मारहाण
मामलेदार कारमधून उतरताच रिक्षाचालकाने शिवीगाळ करत हल्ला केला. लॉज कर्मचारी आणि काही स्थानिकांनी हा प्रकार पाहताच मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. पण, रिक्षाचालकाने त्यांना झिडकारतच मामलेदारांना जबर मारहाण केली.
अखेर जमावाने मामलेदारांना बाजूला केले आणि ते लॉजमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. पण, अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते कोसळले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. नेमका मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की मारहाणीमुळे, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रिक्षाचालकाला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहू मामलेदार कोण होते?
लहू मामलेदार 2012 ते 2017 या काळात गोव्याच्या फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी काही काळ अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्येही प्रवेश केला. मात्र नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले.
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याची तातडीची गरज आहे. राज्यात एका रिक्षाचालकाने माजी आमदाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे नागरिकांच्या मनातील प्रशासनाची भीती कमी झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. कायद्याचा धाक कमी झाल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याची टीका विविध स्तरांतून केली जात आहे. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतले. राज्याच्या हितासाठी फडणवीस अनेक निर्णयावर एका मुहूर्तप करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी ठोस निर्णय घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.