
राजकारणात गौरवाची शाबासकी ही दुर्मीळ असते, पण गडकरींनी गडचिरोलीच्या विकासासाठी फडणवीसांच्या नेतृत्वावर उमटवलेली मोहोर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणाची नवी दिशा दाखवत आहे.
गडचिरोलीचा इतिहास बदलण्याच्या प्रयत्नांना आता केंद्र सरकारकडूनही थेट दाद मिळू लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच झालेल्या कर्मयोगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा गौरव करत त्यांना शाबासकी दिली. 29 वर्षांपूर्वी माओवादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीच्या जमिनीवर आता प्रगतीची बीजे रुजली आहेत. या बदलामागे सर्वात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा आहे, असे गडकरी यांनी जाहीरपणे सांगितले.
आज गडचिरोलीमध्ये 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 1 हजार 200 शिक्षक कार्यरत आहेत. या आकड्यांचा मागोवा घेताना, गडकरी यांनी जुन्या काळातील धोकादायक परिस्थिती आठवली. त्यांनी निवडणूकीच्या काळातील एक किस्सा सांगितला की, त्यावेळी पोलीस बंदोबस्तात प्रचार करावा लागत होता. आज मात्र गडचिरोलीच्या जमिनीवर विकासाची गती दिसते आहे.

निर्णयातून झपाट्याने गुंतवणूक
फडणवीस सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. ही गुंतवणूक थेट दावोसहून आकर्षित झाली आहे. यामुळे गडचिरोलीमध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचे लोखंड तयार होणार आहे. लोखंड आणि खनिजांच्या खाणीतून प्रगतीचा मार्ग खुलेआम सुटू लागला आहे.
गडचिरोली भागात विशेष रस्त्यांचे जाळे तयार करण्याची कल्पनाही पुढे आली आहे. रायपूर ते विशाखापट्टणम एक्सप्रेसवेप्रमाणे, गडचिरोली ते विशाखापट्टणम बंदर जोडणारा रस्ता उभारण्याचा संकल्प गडकरी यांनी केला आहे. एकदा का बंदराशी थेट संपर्क झाला की, भागातील औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
माओवाद्यांना मुख्य प्रवाह
गडकरी यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचे आणखी एक महत्त्वाचे यश सांगितले ते म्हणजे माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे 3 हजार माओवाद्यांनी शस्त्र टाकून सामान्य जीवन स्विकारले. ही सामाजिक सलोख्याची प्रक्रिया फडणवीसांच्या सर्वसमावेशक धोरणातून शक्य झाली आहे.
गडचिरोलीसारख्या भागात विकास, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समावेश या सगळ्या गोष्टींना एकाच वेळी हात घालणारे नेतृत्व ही आजची गरज होती. फडणवीसांनी ती गरज ओळखून धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
महाराष्ट्रासाठी नवा आदर्श
कार्यक्रमातील गडकरींचे वक्तव्य हे फडणवीसांच्या कार्यपद्धतीवरचा सार्वजनिक ठसा ठरला आहे. एकीकडे पायाभूत सुविधा निर्माण करणारे केंद्र, तर दुसरीकडे लोकाभिमुख धोरणे राबवणारे राज्य, अशा या यशस्वी संयोजनातून महाराष्ट्रातील दुर्लक्षित भागही आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
गडचिरोलीसारख्या भागात सकारात्मक चित्र निर्माण करणारे हे नेतृत्व केवळ प्रशंसेचे नाही, तर इतर राज्यांसाठीही अनुकरणीय ठरणारे आहे. गडकरींच्या शाबासकीमुळे फडणवीसांच्या विकासयात्रेला नवा उत्साह लाभला आहे. हे नेतृत्व राज्याच्या विकासनितीत एक नवा अध्याय लिहीत आहे.