
ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला जन्म दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत राजकीय कारस्थानाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे वादाचा वणवा पेटताना दिसत आहे. मुंबईतील प्रवर्तन निर्देशालायाच्या कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. या आगीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात, आगीमुळे कार्यालयातील कागदपत्रं, संगणक, आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. यावर आता अनेक राजकीय नेत्यांचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत मिश्किल टिप्पणी करत सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे. सब गोलमाल हैं भाई, सब गोलमाल हैं. सिधे रस्ते के यह तेढी चाल हैं, असं म्हणत त्यांनी आगीच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
सपकाळ म्हणाले, आश्चर्यकारकपणे, आज ईडीनेच स्वतःचं कार्यालय जाळून घेतलं. आता कुठलेही पुरावे उरलेले नाहीत. राजकीय ड्रामा तयार करण्यासाठी ही आग लावून ते मोकळे झाले आहेत. राजकीय कारस्थान कसं असतं, याचा हा एक अत्यंत स्पष्ट आणि निंदनीय नमुना आहे. ईडीच्या कार्यालयाच्या आगीमुळे राजकीय वाद तंत्रशुद्धपणे पेटले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आरोप आहेत की ईडी आणि सरकार यांचा एक गहिरा राजकीय डाव आहे. गेल्या दहा वर्षांपासून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी, आणि पक्षांतर करण्यासाठी ईडी कार्यालयाचा वापर करण्यात आला होता, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

विरोधकांची सरकारवर टीका
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी नऊ वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कागदपत्रांचे नुकसानही झाल्याचे समोर आले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ईडीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा सुरक्षित बॅकअप आहे. आगीमुळे कोणत्याही तपासावर किंवा केसांवर परिणाम झाला नाही. तरीही, या घटनेच्या चुकत, आगीच्या कारणाची चौकशी सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर तासून तास टीका करण्यास सुरुवात केली आहे. ईडी कार्यालयात लागलेल्या आगीवर सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली.
जिथे पार्किंग, गर्दी आणि मोठा रस्ता आहे, तिथे आग लागल्यानंतर कितव्या मिनिटात आगीचा बंब पोहोचला? इतकी प्रगत टेक्नोलॉजी असताना फायली जळाल्या, तर त्याचा बॅकअप असावा लागतो. आग कशी लागली. वेळेत का विझवली गेली नाही? बीएमसीला याबद्दल उत्तरे द्यावीत लागतील, असं त्यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय हेराल्ड प्रकरणासोबतच, ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निधीचा गैरवापर केला आणि एजेएलच्या मालमत्तेचे हस्तांतरण यंग इंडियन या खाजगी कंपनीला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Nagpur Municipal Corporation : गळतीला जबाबदार उपअभियंता निलंबित
ईडीच्या तपासामध्ये हे उघड झाले आहे की काँग्रेसने आपल्या पक्षाच्या निधीचा गैरवापर करून खाजगी फायदे मिळवले असल्याचा आरोप आहे. मात्र आग लागल्याने आता विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. कदाचित याच कारणामुळे या आगीने राजकीय वादाचा रूप घेतला आहे. ईडीच्या कार्यालयात लागलेली आग आणि त्याचे संभाव्य राजकीय प्रभाव यावर पुढील काळात अधिक तपास होईल, आणि राजकारणाच्या पुढील वळणाची वाटचाल पहाणे महत्त्वाचे ठरेल.