महाराष्ट्र

Operation Sindoor : दात घशात घातले; लाहोर, इस्लामाबाद, बाजवाडवर बॉम्बवर्षा

India Vs Pakistan : दुसऱ्या दिवशी हल्ल्याचा प्रयत्न ‘नाकाम’

Share:

Author

नांगी ठेचल्यानंतरही बुद्धी जागेवर न आलेल्या पाकिस्तानवर भारताने मोठा प्रतिहल्ला केला. लाहोर, बाजवाड, सियालकोट या भागात हा हल्ला करण्यात आला.

लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा भारतानं उद्ध्वस्त केल्यानंतरही बुद्धी जागेवर न आल्यानं पाकिस्ताननं गुरुवारी (8 मे) रात्री पुन्हा एकदा भारतीय भूभागावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देत भारतानं लाहोर, बाजवाड, सियालकोट भागांवर तुफानी प्रतिहल्ला केला. रात्री साडेदहा पर्यंत भारतानं पाकिस्तानचे दोन लढाऊ विमानं पाडली. हल्ल्याला सुरुवात झाल्यानंतर सिमावर्ती भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं. भारतानं प्रतिहल्ला केल्यानंतर अख्ख्या पाकिस्तानात सायरनचे आवाज ऐकायला येऊ लागले. काश्मीरपासून राजस्थान आणि पंजाबपर्यंतच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एअर डिफेन्स यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं पाकिस्तानला भारतीय मिसाइलपासून कुणीही वाचवू शकले नाही. केंद्र सरकारकडून सलग दोन दिवसांपासून पाकिस्तानला इशारा दिला जात आहे. पाकिस्ताननं कोणतीही क्रिया केली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतरही सलग दोन दिवसांपासून पाकिस्तान रात्रीच्या सुमारास भारतीय भूभागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे. बुधवारी (7 मे) रात्री पाकिस्ताननं 15 भारतीय स्थळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी देखील असाच प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला.

एअर वॉर्नही जमीनदोस्त

रात्री साडेदहाच्या सुमारास भारतानं पंजाबजवळ पाकिस्तानचं आणखी एक रडार नष्ट केलं. केंद्र सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नष्ट करण्यात आलेल्या यंत्रणेला ‘एअर वॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ म्हटले जाते. भारतानं हल्ला सुरू केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तातडीनं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. भारतानं हल्ल्याला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीनं पाकिस्तान सोडण्याचा आदेश दिला होता. कदाचित याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत सरकारशी संपर्क साधला असावा, असे सांगण्यात येत आहे.

Navneet Rana : दिल्लीच्या गादीवर पाकिस्तानचा बाप बसलाय

एस. जयशंकर यांनी युरोपीयन युनियनच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की भारत सरकार अत्यंत संयमानं प्रत्युत्तर देत आहे. सामान्य नागरिकांना कोणतीही ईजा होणार नाही, अशा पद्धतीनं हल्ला करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर युरोपीय युनियननं भारतासोबत असल्याचं स्पष्ट केलं. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर चीन, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकाला लागून असलेल्या सीमावर्ती भागात ‘हाय अलर्ट’ लागू करण्यात आला आहे. भारतानं हवाई हल्ला सुरू केल्यानंतर लाहोर, सियालकोट भागात मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यानंतर रात्री 11.40 वाजताच्या सुमारास पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवरही हल्ला करण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!