देश

Narendra Modi : सौगंध मुझे इस मिट्टी की, देश मिटने नहीं दूंगा, झुकने नहीं दूंगा

Operation Sindoor : रेल्वे विकास लोकार्पणासोबतच मोदींनी पाकिस्तानला दिला भीषण संदेश

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे पायाभूत विकासाचा लोकार्पण करत देशाच्या प्रगतीचा आणि आधुनिक भारताच्या निर्मितीचा आश्वासन दिले. त्यांनी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला कडक इशारा देत, भारताच्या सुरक्षा व एकात्मतेसाठी ठाम भूमिका दर्शवली.

देशाच्या विकासाच्या प्रवासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे पायाभूत सुविधा विकासाच्या कामांचा लोकार्पण करत18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रेल्वेने जोडले गेले असल्याचा अभिमान व्यक्त केला. करणीमातेच्या आशीर्वादाने विकसित भारताची स्वप्ने साकार होत आहेत, असे मोदी म्हणाले. 26 हजार कोटींच्या या विकासकामांचा शुभारंभ करून त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारताच्या आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीसाठी आज देशात एक यज्ञ सुरू आहे, जो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचा ठरेल.

पंतप्रधान मोदी यांनी या पार्श्ववभूमीवर आपल्या भाषणात पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले, ‘सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा.’ मोदींनी भारतीय सैन्य दलाच्या ताकदीचा आणि एकजुटीचा गौरव करत सांगितले की, 22 तारखेला झालेल्या हल्ल्याच्या उत्तरात केवळ 22 मिनिटांतच भारतीय सैन्याने 9 दहशतवादी ठिकाणांवर प्रभावी कारवाई केली. दहशतवाद्यांनी देशातील महिलांच्या सन्मानाला दिलेला धोका त्यांनी नाकारला नाही. परंतु त्यांना धडा शिकवला गेला आहे.

Amravati : शेतकऱ्यांच्या वेदनांचा ट्रॅक्टर घेऊन काँग्रेस सत्तेच्या दारात

गरम सिंदूर

‘जो सिंदूर मिटाने निकले थे, उन्हें हमने मिट्टी में मिला दिया,’ असे कड़क वक्तव्य मोदींनी केले. हा शोध प्रतिशोध नव्हे, तर न्यायाचा नवा स्वरूप असल्याचा ठसका त्यांनी दिला आणि नव्या भारताच्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. मोदींच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिसाद उमटत आहेत. अनेकांनी त्यांचे कौतुक केले करत समर्थन केले आहे. पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरू शकत नाही. आता वार केला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

वेळ आणि जागा निश्चित करण्याचा अधिकार सैनिकांच्या हाती असून, पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला दाखवण्याचा त्यांचा मानस आहे. मोदी म्हणाले की, पाकिस्तान कधीही भारताशी सरळ लढू शकत नाही, म्हणूनच त्यांनी दहशतवाद्यांना एक हत्यार बनवलं आहे. मोदींच्या या कडक वक्तव्यानंतर पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला की त्यांच्या सैन्याला आणि अर्थव्यवस्थेला या सर्व प्रकारांची किंमत चुकवावी लागणार आहे. ‘मोदी के शरीर में लहू नहीं, गरम सिंदूर बहता है,’ असेही त्यांनी नमूद केले.

Prakash Ambedkar : स्थानिक निवडणुकीसाठी वंचित आघाडीची संघटनात्मक कमांड

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!