
भारत सरकार मेक इन इंडिया’ पीएलआय योजना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या उपक्रमांद्वारे देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवत आहे. ज्यामुळे परकीय गुंतवणूक वाढते आहे.
भारत आता केवळ एक बाजारपेठ राहिलेला नाही, तर एक नव्या औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू बनू पाहतो आहे. सरकारने भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा संकल्प केला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होणारच, पण भारत वेगवेगळ्या आघाडीच्या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर उभा राहणार आकाश आहे. भारतातील कुशल मनुष्यबळ, नैसर्गिक संसाधनांचा विपुल साठा आणि वाढती तंत्रज्ञान साक्षरता यामुळे जगभरातील उद्योगांची नजर भारतावर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स आणि ऑटोमोबाईल्ससारख्या क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेत आहे.
विशेषतः जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीसाठी मोठी उत्सुकता दाखवली आहे. भारताने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक बहुआयामी धोरण आखले आहे. उद्योग-विशिष्ट सवलती, आर्थिक पॅकेजेस आणि धोरणात्मक सहकार्य यामुळे भारतात 2014 ते 2024 दरम्यान तब्बल 667.4 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित झाल्याचा अंदाज आहे. भारत जगातील सर्वात मोठा दुचाकी वाहन उत्पादक आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर एका औद्योगिक परिवर्तनाची पावती आहे. यात भारताच्या तरुण लोकसंख्येचा, विशेषतः मध्यमवर्गाचा मोठा वाटा आहे.

BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे
जागतिक दर्जाचे उत्पादन
मध्यम वर्गामुळे देशांतर्गत मागणीही सतत वाढते आहे. मग ती ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स असो, ऑटो घटक असोत की आरोग्य व अन्न प्रक्रिया क्षेत्र. भारतातील उत्पादन क्षेत्राच्या यशामागे मेक इन इंडिया, राष्ट्रीय उत्पादन धोरण, पीएलआय योजना आणि हरित उत्पादन अशा विविध उपक्रमांचा हात आहे. मेक इन इंडिया या अभियानाने नुकतीच आपली दशकपूर्ती साजरी केली आहे. या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे. आयातीवरील अवलंबन कमी करणे, नव्या रोजगार संधी निर्माण करणे आणि भारताला एक स्वावलंबी आणि नाविन्यपूर्ण उत्पादन केंद्र बनवणे. हे उपक्रम केवळ उद्योग वाढवण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते पर्यावरणस्नेही उत्पादन आणि हरित तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन देतात.
भारतातील उत्पादन कंपन्या आता जागतिक दर्जाची उत्पादने तयार करत आहेत. परिणामी, भारताची ओळख सस्तं आणि उत्तम उत्पादन देश म्हणून नव्हे तर गुणवत्तेच्या शिखरावर असलेल्या राष्ट्र म्हणून होऊ लागली आहे. भारतीय कारागिरांची कलाकुसर, हजारो वर्षांची परंपरा आणि त्यांच्या हातातले कौशल्य अजूनही परदेशी बाजारात विशेष स्थान मिळवत आहे. आपल्या सांस्कृतिक विविधतेमुळे भारतातील प्रत्येक राज्यात काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन होत असते. ही उत्पादने आजही परदेशी ग्राहकांसाठी आकर्षण ठरतात. भारत सरकारने आता या पारंपरिक उद्योगांनाही बळकटी देण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात केवळ मल्टीनॅशनल्सच नाही, तर लघुउद्योगांनाही एक नवे बळ मिळाले आहे.