देश

Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान

Sofiya Qureshi Incident : मोदींमध्ये हिंमत नाही, न्यायालयात न्याय मागावा लागतो

Author

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर टीका करत युद्धविरामामुळे भारताला मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप केला.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरण अधिकच तापले आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भारत सरकारवर टीकेची झोड उठवत, अनेक ठळक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं आहे. त्यांच्या मतानुसार, युद्धविराम जरी शांततेच्या दिशेने पाऊल वाटत असलं, तरी त्याचा सर्वाधिक फटका भारतालाच बसल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलावर मोठा प्रहार करत त्यांची 20 टक्के क्षमता उद्ध्वस्त केली. हे यश नक्कीच मोठं आहे.

युद्धावर वर्चस्व मात्र मिळवताना अचानक युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला, आणि त्यामुळेच भारताचं मोठं नुकसान झालं, असं आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, जर युद्धविरामाच्या आधी भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांविषयी सखोल माहिती मिळवली असती, तर जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागात भारतीय लष्कराला गावोगाव हिंडून अतिरेक्यांचा शोध घ्यावा लागला नसता. आपण युद्ध थांबवण्याची मागणी मान्य केली. पण त्याआधी पाकिस्तानकडून माहिती मिळवून घ्यायला हवी होती.

Ulhas Narad : शिक्षण घोटाळ्याचे मास्टरमाइंड कोर्टाच्या दारातून बाहेर

चीनविषयी चिंता व्यक्त

माहिती असती तर आजच्या परिस्थितीपासून आपण वाचलो असतो, अशी टीकाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, आज पुन्हा लष्कराला एनकाउंटर करावा लागत आहे, कारण आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही. पाकिस्तान सतत दहशतवादी एक्सपोर्ट करत आहे. काही आंतरराष्ट्रीय संघटना त्यांना थेट मदत करत आहेत, असा गंभीर आरोप करताना आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. मोदी काहीही बोलत नाहीत, त्यामुळे ट्रम्प काय म्हणतो तेच खरं मानावं लागतं, असं ते म्हणाले.

आंबेडकर यांनी भारत सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानविरोधात ठोस पावलं उचलण्याचे आवाहन करत, भारताकडे ही क्षमता आहे. ती दाखवणं आता गरजेचं आहे, असं मत मांडलं. चीनबाबतही त्यांनी मतप्रदर्शन केलं. चीनने काही गावांची नावे बदलल्याची बातमी खरी असली तरी त्यांनी घुसखोरी केली की नाही, याची खात्री नाही. पण बोधगयातील शांततेच्या आंदोलनावर प्रशासनानं बळाचा वापर केल्याचं समजतं, आणि भिक्षूंना ताब्यात घेतलं जात आहे. ही गोष्ट खरोखरच चिंताजनक आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

Shiv Sena Akola : ‘गोपीसेठ’चा काटा काढण्यासाठी फिल्डिंग 

काँग्रेसवर जोरदार टीका

राजकीय पातळीवर टीका करताना आंबेडकरांनी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही लक्ष्य केलं. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस नेतृत्वानं कच खाल्ली आहे, असा टोला त्यांनी लगावला. तर रामदास आठवलेंच्या मुंबईची इस्लामाबाद होऊ देऊ नका या वक्तव्यावर त्यांनी मिश्कील टिप्पणी करत, तुमच्याकडे गहू नाही, पण सगळ्या पुऱ्या लाटायला चाललात, असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली.सोफिया कुरेशी प्रकरणावरही भाष्य करताना त्यांनी मोदींवर पक्षातील लोकांवर कारवाई न करण्याचा आरोप केला. मोदींमध्ये आपल्या पक्षातील लोकांवर कारवाई करण्याची हिंमत नाही, त्यामुळेच न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागतो, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!