देश

Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली

Congress : स्वातंत्र्याच्या काळापासून भाजप आरएसएसला शरणागती पत्करण्याची सवय

Author

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा केला. मात्र, त्यानंतर अचानक युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला, ज्यावर खासदार राहुल गांधींनी मोठे विधान केले आहे.

एप्रिल महिन्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडकडीत पावले उचलली आणि ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना तोंड दिले. भारतीय सैन्याने 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करून स्पष्ट संदेश दिला की, देशाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड होणार नाही. मात्र काही काळानंतर अचानक युद्धबंदी जाहीर करण्यात आली, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भोपाळमध्ये मंगळवारी दिलेल्या भाषणात खासदार राहुल गांधींनी केंद्र सरकारवर सत्ताधाऱ्यांच्या वर्तनावर कठोर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच युद्धबंदीचा निर्णय स्वीकारला, म्हणजेच शरणागती पत्करली. ते म्हणाले की, इतिहास साक्षी आहे की, भाजप आणि आरएसएसचे हेच चरित्र आहे, ते नेहमीच दबावाखाली झुकतात. राहुल गांधींनी यापूर्वी 1971 मध्ये भारताने अमेरिकेच्या धमकीला न जुमानता पाकिस्तानाचा कसा पराभव केला हेही सांगितले.

MSRTC : एसटी तिकीटाच आता पुरुषांनाही दिलासा 

काँग्रेसचा बब्बर प्रतिकार

काँग्रेसचे बब्बर शेर आणि सिंहीणी महासत्तेविरुद्ध लढतात, ते कधीच झुकत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या मते, जर देशात काँग्रेसचे सरकार असते तर कधीही शरणागती पत्करली नसती. राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसवर थेट टोलेबाजी केली. ते म्हणाले, मी भाजप-आरएसएसला चांगले ओळखतो. त्यांच्यावर थोडासा दबाव येताच ते घाबरून पळून जातात. त्यामुळे जेव्हा ट्रम्पने मोदींना फोन केला, तेव्हा त्यांनी त्याचे आदेश मान्य केले. राहुल गांधींनी अजूनही स्पष्ट केले की, स्वातंत्र्याच्या काळापासून हे पक्ष शरणागती पत्करण्याची सवय करत आहेत.

राजकीय वर्तुळात आता या आरोपांमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचे मृत्यू झाले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्यामध्ये दहशतवाद्यांवर सडेतोड कारवाई करण्यात आली. पाकिस्तानच्या हवाई तळांवरही हल्ले करण्यात आले. परंतु, युद्धबंदीची घोषणा केल्यामुळे भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर तात्पुरते स्थगित असल्याची माहिती दिली आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की ऑपरेशन अजूनही संपलेले नाही, आवश्यक तेव्हा पुन्हा सुरू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे.

Yashomati Thakur : पार्टी विथ डिफरेंस कुठे हरवली

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!