महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : देशद्रोह्यांना फासावर लटवण्याची गरज

Congress : गद्दारांचं झाड मुळासकट उपाटावं 

Author

पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशद्रोह्यांना कोणत्याही धर्म किंवा पक्षापेक्षा वर मानून थेट सार्वजनिक फाशी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राला भारताची गोपनीय माहिती पुरवणाऱ्या यूट्यूबर ज्योति मल्होत्रा हिला अटक झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशद्रोह्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, भारताच्या आत किंवा बाहेर कुठेही लपलेले देशद्रोही असोत, त्यांना कधीही माफ करू नये. त्यांनी कोणत्या धर्माचे किंवा जातीचे आहेत. याचा विचार न करता, गद्दारी करणाऱ्यांना सरळ फाशीची शिक्षा व्हावी. ही शिक्षा सार्वजनिकरित्या दिली पाहिजे, जेणेकरून इतरांनाही धडा मिळेल. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले, “पुण्यातील डीआरडीओ माहिती गळती प्रकरणात अटक झालेला प्रदीप हा एक आरएसएस कार्यकर्ता आहे. देशभक्तीचा गजर करणाऱ्या संघटनांनी आता उत्तर द्यावं लागेल की, त्यांच्या पंखाखाली असे देशद्रोही कसे तयार होत आहेत?”

गद्दाराला क्षमा नाही

देशद्रोह करणाऱ्या कुणालाही, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, क्षमा देणे योग्य नाही. गद्दार हा गद्दारच असतो. देशाशी गद्दारी करणाराच देशाचा शत्रू असतो आणि अशा लोकांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, असे स्पष्ट मत वडेट्टीवारांनी व्यक्त केले. वडेट्टीवार यांनी फक्त आरोपींवरच नव्हे तर देशातील गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. पुलवामा हल्ल्यात वापरलेले आरडीएक्स कुठून आले? ते कसे पोहोचले? याचा तपास अद्यापही पूर्ण का झाला नाही? आणि पहलगाम हल्ल्यात दाखवण्यात आलेला दहशतवादी 2015 मध्येच मारला गेला होता. मग पुन्हा त्याचे नाव आणि चेहरा का पुढे आणला जातोय? ही माहिती कोणासाठी आहे?” असा सवाल त्यांनी केला.

Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार

वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना सांगितले, “देशद्रोह्यांवर कारवाई करताना धर्म, जात, पक्ष यांचा विचार करू नका. केवळ देशाला महत्व द्या. जो देशाशी गद्दारी करेल, त्याला उघडपणे फाशी द्या. हीच खरी देशभक्ती आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या प्रखर विधानांनी देशद्रोहाच्या मुद्द्यावर नवा वादंग पेटण्याची शक्यता आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही, हा संदेश त्यांनी ठामपणे दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!