
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी घोषित उमेदवारांच्या यादीतून संघनिष्ठ आणि निष्ठावान नेते माधव भंडारी यांचे नाव पुन्हा वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदानाचा ‘महामॅच’ रंगणार आहे. मात्र त्याआधीच राजकीय ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ सुरू झालेत. महायुतीत जागावाटपाचा हिशोब लागला, भाजपच्या खिशात तीन जागा, शिवसेनेला एक आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक. भाजपने आपल्या ‘तीन मस्किटिअर्स’ ची नावं जाहीर केली दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी. या तिघांना ‘अर्ज भरा रे बाबांनो’ असं बजावलं गेलंय. पण या सगळ्या गडबडीत ‘एक हिरो पुन्हा झीरो’ झालाय असल्याचं दिसून येत आहे. ते म्हणजे माधव भंडारी. अरे भाऊ, भंडारी भाऊ पुन्हा चर्चेत आहेत, पण यावेळीही त्यांचं टिकट हवेतच हरवलं की काय अश्या चर्चा आता फिरू लागल्या आहेत.
दिल्लीला गेलेल्या लिस्ट मध्ये भंडारी भाऊ आणि अमरनाथ राजूरकर यांची नावं हायलाइट झाली होती, असं गॉसिप गँग म्हणत होती. पण अंतिम यादीत भंडारी भाऊंचं नाव कट झालं, आणि कार्यकर्ते अरे भाऊ, हे काय ड्रामेबाजी? असं ओरडायला लागले. दुसऱ्या चेहऱ्यांना ‘चान्स मारो’ म्हणत भाजपने बाजी मारली, पण जुन्या फॅन्सच्या मनात भंडारी भाऊंना कधी बरं लॉटरी लागणार? असा प्रश्न डोकं खातोय. भंडारी भाऊंचे ‘फॅन क्लब’ तर म्हणतंय, अरे, आमच्या भाऊंचं नशीब कधी उघडणार, की फक्त चर्चेतच राहणार?

संधी गेली
माधव भंडारी हा असा सुपरमॅन जो भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निष्ठेचा ढोल वाजवतोय, पण तरीही विधानपरिषदेची बस त्यांना चुकतेय. कार्यकर्ते म्हणतायत, भाऊ, तुम्ही तर निष्ठेचे धनी, पण टिकटाचं काय झालं रे भाऊ? 2014 पासून भाजप सत्तेत आहे, पण भंडारी भाऊंना ‘बस स्टॉप वरच सोडलंय. दरवेळी त्यांचं नाव ‘हवा हवासा’ वाटतं, पण शेवटी ‘हातात फक्त हवा’ येते. यंदाही तोच डायलॉग, तोच सीन, भंडारी भाऊंची संधी फुस्स, आणि आता पक्षात हाय रे भाऊ, काय चाललंय? अशी हशा-हशाची लाट पसरलीय.
पाच जागांपैकी भाजपला तीन, आणि उरलेल्या दोन जागा शिवसेना-राष्ट्रवादीत हाफ-हाफ असं झालाय. 18 मार्च ही अर्ज भरण्याची डेडलाइन आहे. मात्र भाजपने आपले तीन शहाणे पुढे केलेत. पण भंडारी भाऊंची मिसिंग स्टोरी पक्षात कॉमेडी सर्कस सुरू करतेय. कार्यकर्ते म्हणतायत, नव्या लोकांना चान्स, आणि आमच्या भाऊंना फक्त डान्स?, असाच काहीस सध्या राजकारणात सुरु आहे.
Harshwardhan Sapkal : भाजपसाठी संविधान बाजूला, बंच ऑफ थॉट्स पुढे
निष्ठेची किंमत
भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी हे 1980 पासून पक्षासाठी कार्यरत आहेत. 2010 पासून मुख्य प्रवक्ते म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. आणीबाणीच्या काळात पत्रकारितेतही त्यांनी योगदान दिले आहे. महाराष्ट्र भाजपच्या संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावूनही, विधानपरिषदेसाठी त्यांना संधी मिळालेली नाही. ‘निष्ठा आहे, पण जागा नाही’ अशी त्यांची अवस्था कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.