
काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर निवडणूक चोरी केल्याचा आरोप केला केल्याने राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरू झाली आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उसळले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर मत चोरी केल्याचा गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एका इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी हे विधान केल्यानंतर विरोधकांना एक नवा मुद्दा गवसला, तर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत या आरोपांना खोडून काढले आहे. या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधींनी आधी आत्मपरीक्षण करावे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला.
फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानांना बिनबुडाचे आणि लोकशाहीची खिल्ली उडवणारे ठरवत काँग्रेसच्या नेतृत्वाला उद्देशून म्हटले की, आपल्या पक्षाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवांनी राहुल गांधी हताश झाले आहे. खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींनी बोस्टनमध्ये केलेल्या वक्तव्यांवरही टीका केली. भारताच्या निवडणूक आयोगावर परदेशात टीका करणे आणि देशांतर्गत निवडणूक प्रक्रियेबाबत चुकीचे चित्र रंगवणे म्हणजे भारतीय लोकशाही संस्थांची बदनामी करण्यासारखे आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या मते, ही एक सुनियोजित रणनीती असून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

Nana Patole : वकिलीच्या रंगमंचावर फडणवीस, पण न्यायासन अजूनही मूक
पारदर्शकतेची मागणी वाढली
राहुल गांधींच्या या आरोपांनी विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनाही संधी दिली आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपली परखड प्रतिक्रिया नोंदवली आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रत्युत्तरावर सडेतोड सवाल उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री महोदयांचा आजचा लेख केवळ जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे. मात्र अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यांनी सरकारला थेट सवाल करत विचारले की, निवडणूक आयुक्तांची निवड करताना सरन्यायाधीशांना का वगळण्यात आले? महाराष्ट्रातील मतदार यादी इतकी फुगली कशी?
मतदार संख्येपेक्षा अधिक मतदान होऊच कसे शकते? मतदारांच्या वाढीमध्ये आणि वगळण्याच्या प्रक्रियेमध्ये इतकी विसंगती का आहे? अंतिम मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज मागण्यावर नकार का दिला गेला? तसेच, 1961 निवडणूक आचारसंहितेत बदल करून या प्रक्रियेत पारदर्शकता टाळण्याचा प्रयत्न का झाला? या सर्व गंभीर मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली. राहुल गांधींच्या आरोपांपासून सुरू झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यातील हा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Akola : शिवसैनिकांमध्ये संभ्रम नाही, निर्णय एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच