महाराष्ट्र

Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते

Political Drama : राहुल गांधींच्या लेखाने सत्ताधारी आले अडचणीत

Author

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या प्रमाणातील अनियमिततेचा आरोप करून राजकारणात खळबळ उडवली आहे. यशोमती ठाकूर यांनीही भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उभे केले आहेत.

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या गोटात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी या निवडणुकीतील अनियमिततेकडे बोट दाखवत संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्याने आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील आक्रमक भूमिका घेत, भाजपसह निवडणूक आयोगालाही थेट सवाल विचारले आहेत.

राहुल गांधींनी एका विशेष लेखाद्वारे 2024 विधानसभा निवडणुकीतील गोंधळ उघड केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ किरकोळ अनियमितता नसून लोकशाहीच्या गळचेपीचा गंभीर प्रकार आहे. ते म्हणाले, ही निवडणूक प्रक्रिया आणि आकडेवारीतील अस्वाभाविक विसंगतीमुळे संशयास्पद ठरते. 2024 मध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंतची प्रोव्हिजनल मतदान टक्केवारी 58.22 टक्के होती. दुसऱ्या दिवशी तीच अंतिम टक्केवारी 66.05 टक्क्यांवर पोहोचली. म्हणजे एकाच रात्रीत तब्बल 7.83 टक्के म्हणजे सुमारे 76 लाख मतदान कसे वाढले, हा मोठा प्रश्न आहे. राहुल गांधींच्या या भूमिकेला पाठिंबा देताना यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर आणि निवडणूक आयोगावर थेट सवालांची मालिका सुरू केली आहे.

Prakash Ambedkar : बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून न्यायमंदिरातच पेटला वाद

व्हिडिओ रेकॉर्डिंग मागणी

मुख्यमंत्र्यांनी निदान इतकं तरी दाखवा की भाजप आणि निवडणूक आयोग वेगळे आहेत. अन्यथा तुम्हीच आयोगाची बाजू मांडताय का? असा खणखणीत सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, राज्यात 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची आणि नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी स्पष्ट का होत नाही? तसेच, 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाले असे आयोग म्हणतो, पण भाजपचा आकडा वेगळा का आहे? या मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग महाविकास आघाडी मागत असताना ते का दिले जात नाही? विशेष 12 हजार बूथवरच तरुण मतदार वाढले, उर्वरित 88 हजार बूथवर का नाही? वाढलेल्या मतदारांपैकी बहुसंख्य मतदान महायुतीच्या उमेदवारांकडेच का गेले?

फोटोसह मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज कधी दिले जाणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राहुल गांधी 5 महिन्यांत झालेल्या अनैसर्गिक मतदार नोंदणीबद्दल बोलतात, आणि तुम्ही मात्र 5 वर्षांची वाढ सांगता हे कसे शक्य आहे? अशा सलग प्रश्नमंजुषा ठाकूर यांनी उभी करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.  राहुल गांधींच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव्या चर्चेची लाट उसळली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून विरोधकांकडून याचा जोरदार प्रतिवाद केला जात आहे. सत्ताधारी पक्षाने अद्याप या आरोपांवर अधिकृत खुलासा दिलेला नाही, मात्र पुढील काही दिवसांत निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि आकडेवारीतील विसंगती हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहणार हे निश्चित आहे.

Anil Deshmukh : मुख्यमंत्री जनतेचे लक्ष भरकटवत आहे

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!