देश

Rahul Gandhi : विधानसभा मतदान भटकंतीचा गूढ अखेर उलगडला

Maharashtra : चाळीस लाख बनावट मतदारांचे कोडं फोडले काँग्रेसने

Post View : 31

Author

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बनावट मतदार असून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आणि निवडणूक आयोग आणि भाजपने यामध्ये सहकार्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

2024 लोकसभा निवडणूकींमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी विजयाच्या झेंड्याचा डंका वाजवला आणि मोठ्या संख्येने जागा आपल्या नावावर नोंदवल्या होत्या. पण महाराष्ट्रात  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची आत्मविश्वासाची हवा अचानक कशी फुटू लागली, हे अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून सतत विधानसभा निवडणूक चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा या आरोपांचा सूर अगदीच तिखट आहे. निवडणूक आयोगानेही या आरोपांवर काँग्रेसला कडक नोटीस दिली आहे. परंतु काँग्रेसला या अपयशाचा घाण आवरता येत नाही, म्हणून त्यांनी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनियमिततेचा खुलासा करायला सुरुवात केली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट गंभीर आरोप करत मतदार यादीतील गडबडी सादर केली. त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या मतदार यादीतील अनेक संशयास्पद नोंदींचा पर्दाफाश केला. महाराष्ट्रात 40 लाख बनावट नावे कशी आलीत, ते आम्हालाही कळत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत अनेक गोंधळ झालेला आहे. एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी, फोटोंचा अभाव आणि बनावट पत्त्यांची भरमार यामुळे आम्हाला निष्कर्षावर पोहोचायला वेळ लागला नाही की, निवडणूक चोरी झाली आहे. राहुल गांधी यांनी अधिक एक रहस्यही उघड केले की, संध्याकाळी मतदानानंतर अचानक मतदानात झालेली विचित्र वाढ.

Randhir Sawarkar : मातीच्या पायवाटांना मिळाली डांबरी दिशा

आयोगाचे मौन धक्कादायक

सायंकाळी मतदान संपल्यावर मतदानाचे  प्रमाण वाढणे म्हणजे मोठा धक्कादायक प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असं त्यांनी कडवट टोमणा मारला. काँग्रेस कडून निवडणूक आयोगाला या मतदानातील हेराफेरी संदर्भात प्रश्न विचारले गेले, मात्र अजूनही आयोगाकडून कोणताही प्रत्युत्तर मिळालेला नाही. राहुल म्हणाले, मतांची चोरी समजून घेण्यासाठी आम्हाला सहा महिने लागले. आता जे काही मिळालंय, ते धक्कादायक आहे. राहुल गांधी यांच्या मते, निवडणूक आयोगाने मतदारांचा इलेक्ट्रॉनिक डेटा दिला नाही. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे डेटा मागितला, पण त्यांनी त्याचा आग्रह नाकारला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी सांगितले की, मतदार यादीत अनेक ठिकाणी वडिलांच्या नावांसमोर अनोख्या चिन्हांची भरमार आहे.

अनेक घरांची नावे व पत्ते शून्य आहेत. एकाच पत्त्यावर ४६ मतदार नोंदले गेले आहेत. तीन वेळा मतदान करणारे ११ हजारांहून अधिक संशयित मतदारही आहेत. या अनियमिततांमुळे काँग्रेस हरियाणामधील आपल्या पराभवासाठी देखील मतदार यादीची जबाबदारी निवडणूक आयोगावर ठेवत आहे. काँग्रेसच्या या आरोपांमुळे आता निवडणूक आयोगावर आणि सत्ताधारी पक्षांवर मोठा दबाव वाढणार आहे. 40 लाख बनावट मतदार, संध्याकाळी मतदान वाढ, इलेक्ट्रॉनिक डेटा न देणे या सर्व आरोपांनी महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप निर्माण केला आहे. आता पाहणे महत्त्वाचे आहे की, निवडणूक आयोग या आरोपांवर कसे प्रतिक्रिया देतो आणि पुढील कारवाई कोणत्या दिशेने होते. पण एक गोष्ट नक्की आहे, 2024-25 महाराष्ट्राच्या राजकारणात या आरोपांमुळे रंगत अजूनच तिखट होणार आहे.

Parinay Fuke : देवाभाऊंनी आमदारांना दिली मुख्यमंत्री पदाची उपमा

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!