महाराष्ट्र

महाराष्ट्रात March End पर्यंत मिळणार नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष 

महापालिका Election साठी मोठी व्यूहरचना

Author

Views: 27865

महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री झाले आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड भाजप करणार आहे. मार्च अखेरपर्यंत ही निवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. सध्या बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री अशी दुहेरी जबाबदारी आहे. अलीकडेच रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदासारखे अधिकार प्रदान करण्यात आलेत. परंतु भाजपला लवकरच पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्ष नेमावा लागणार आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याचे काम भारतीय जनता पार्टीला करावे लागणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्र भाजपला नवीन अध्यक्ष मिळेल, असे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पार्टीकडून सध्या संघटन पर्व अभियान राबवले जात आहे. त्यानुसार नवीन सदस्यांची नोंदणी केली जात आहे. 20 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान चालणार आहे. त्यानुसार पाच लाख सदस्य करण्याचे लक्ष्य भाजपने डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यानंतर बूथ प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. या निवडीनंतर तालुका अध्यक्षांची निवड देखील करण्यात येणार आहे. तालुका पातळीवरील निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

Total संघटनात्मक बदल

बूथ, तालुका आणि जिल्हा पातळीवरील निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदावर निवड होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमधील निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत इंची निवडणूक देखील होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी जोरदार तयारी करीत आहे.

लाडक्या बहिण योजनेवरून Vijay Wadettiwar यांची सरकारला घेरलं

भाजपचा विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. भाजपमधील सदस्य संख्या वाढवण्यासाठी सर्वच शाखेच्या प्रमुखांना काम करावे लागणार आहे. भाजपमधील सर्व सेलचे प्रमुख सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर दिसेल, असे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या संघटन पर्व अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. संघटन पर्व पूर्ण झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या जागी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष होण्यास इच्छुक नेत्यांना ‘वेट अँड वॉच’ करावे लागणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश देखील मंत्रिमंडळामध्ये झाला आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्ष पदासाठी देखील भारतीय जनता पार्टीला योग्य चेहरा निवडावा लागणार आहे. त्यामुळे भाजप सध्या सदस्य संख्या आणि संघटनात्मक बांधणीवर जोर देत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!