महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विकास करू उत्कृष्ट, लागू नये कोणाचीही दृष्ट

BJP : राज्यातील प्रत्येक नागरिकाला 48 तासांत दाखले मिळणार

Author

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महसूल विभागाच्या कामात गती आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले 48 तासांत प्राप्त होतील, अशी घोषणा केली आहे.

राज्यातील महसूल विभागात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी क्रांतिकारी बदल करण्यात येत आहेत. महसूल विभागामार्फत नागरिकांना 48 तासांत जातीचे, उत्पन्न, रहिवासी व विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळणार असल्याची मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ही योजना संपूर्ण राज्यभर लवकरच लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे महसूल विभागात प्रचंड गती येणार असून जनतेला भ्रष्टाचारमुक्त व वेगवान सेवा उपलब्ध होणार आहे. साताऱ्यातील कऱ्हाड येथे भाजप युवा मोर्चाचे विकासपर्व जनसेवा कार्यालयाक्या उद्घाटनावेळी बावनकुळे बोलत होते.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात महसूल विभागात मोठ्या सुधारणा सुरू असून, यामध्ये नागरिकांना की, 48 तासांत दाखले मिळण्याची योजना महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याद्वारे नागरिकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. ही सेवा संपूर्ण राज्यभर लागू होईल. पाणंद रस्त्यांना क्रमांक देऊन ते मजबूत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महायुतीच्या मजबूत फळीमुळे कऱ्हाडच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. येत्या पाच वर्षांत कऱ्हाड हे राज्यातील सर्वोत्तम स्मार्ट शहरांमध्ये सामील होईल. कऱ्हाड हा विकासाचा आदर्श बनला पाहिजे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

HSRP Number Plate : विरोधकांच्या हल्ल्याला परिवहन आयुक्तांचा ब्रेक 

पीओपी बंदीचा फेरविचार

गणेश मूर्तींसाठी पीओपीवरील बंदीमुळे मूर्तिकारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत पीओपी मूर्ती कृत्रिम जलकुंभात विसर्जित केल्यास बंदी शिथिल करण्यासाठी शासन स्तरावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली.

शासनाच्या योजनांची माहिती आणि तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यासाठी कऱ्हाडमध्ये सुरू करण्यात आलेले विकासपर्व जनसेवा कार्यालय संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा त्वरित लाभ मिळणार आहे.

राज्यात विकास पर्व

भाजपच्या ध्येयधोरणामुळे राज्याचा विकास गतिमान होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पारदर्शक आणि गतिमान सरकार काम करत आहे. त्याच धर्तीवर कऱ्हाडचा विकास होईल, असा विश्वासही मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात भाजपसह महायुतीची मजबूत फळी उभी राहिली आहे. याचा उल्लेख करत मंत्री बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या सरकारमुळे राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. महसूल विभागाच्या सुधारणा हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे.

महसूल विभागात डिजिटल सेवा लागू करून महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, जिथे सर्व महसूल दाखले ऑनलाइन व 48 तासांत उपलब्ध होतील. या योजनेचे लवकरच राज्यभर उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. खासदार आणि आमदारांच्या संख्येने महायुतीची ताकद वाढली आहे. भाजपला कोणाचीही दृष्ट लागू नये. महायुतीला जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. हे प्रेम विश्वासात बदलण्यासाठी आम्ही शेवटच्या माणसापर्यंत विकासकामे पोहोचवणार आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!