महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आले शेतकऱ्यांचे अच्छे दिन

Nagpur: ॲग्रीस्टॉक प्रणालीमुळे थेट बाजारपेठेशी संपर्क

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता शेतकऱ्यांना वार्षिक 15 हजार आर्थिक मदत मिळणार आहे, जी त्यांच्या विकासाला नवा वेग देईल.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अभूतपूर्व आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीत मोठी वाढ जाहीर करत, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ही मदत 9 हजार रुपयांनी वाढवून एकूण 15 हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM-KISAN योजनेचा 19वा हप्ता ऑनलाइन वितरित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारच्या शेतकरीहिताच्या महत्त्वपूर्ण योजनांबाबत माहिती दिली.

Mahayuti: यंदाच्या होळीला लाडकींसाठी गुलालासोबत साड्यांची उधळण

कृषी संजीवनी योजना

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात आणि शेतीचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध योजना राबवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या कार्यकाळात याआधी जलयुक्त शिवार आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. आता या योजनांचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळप्रवण भागांचा समावेश करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 6 हजार कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो गावे जलसंपन्न होणार असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

शेतकऱ्यांना दिलासा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी ऍग्रीस्टॉक प्रणाली लागू केली आहे. सध्या 54 टक्के शेतकरी या प्रणालीचा लाभ घेत आहेत, मात्र लवकरच 100 टक्के शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले असून, पुढील पाच वर्षांसाठी वीज बिल येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

Devendra Fadnavis: उर्दू शाळांतील गैरव्यवहारांची चौकशी

सुविधांमध्ये ऐतिहासिक वाढ

शेतकऱ्यांसाठी कृषी सोलर पंप योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. मागील वर्षभरात 2 लाख नवीन सोलर पंप कनेक्शन देण्यात आले आहेत, तर यापूर्वीच्या 2 लाख कनेक्शनसह एकूण 4 लाख सोलर पंप कार्यरत आहेत. राज्य सरकार या सोलर पंपांच्या देखरेख आणि विम्याची जबाबदारी स्वतः उचलणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार असून, 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचे हित हेच राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधा, उत्पादन खर्चातील कपात आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यामुळे राज्यातील शेतकरी लवकरच संपन्न होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Congress : धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी भव्य ‘सद्भावना पदयात्रा’

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!