महाराष्ट्र

Balasaheb Thorat : खड्डेगिरीला नंबर दोन, फसवणुकीला नंबर एक

Congress : महायुतीच्या शंभर दिवसांची रेटिंग परेड विरोधकांच्या निशाण्यावर  

Author

नव्या महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा अहवाल जाहीर झाला असून त्यावर आता राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या अहवालावर टीका करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत ‘न भूतो, न भविष्यति’ अशी मतांची लाट ओलांडत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सत्तेच्या शंभर दिवसांचे प्रगतीपुस्तक सादर केले आहे. राज्यातील सर्व 48 विभागांनी सुरू केलेल्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमाचे हे मूल्यमापन आहे. या यादीत अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास विभागाने 80 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखालील या खात्याला मिळालेली शाबाशी सरकारसाठी अभिमानास्पद असली तरी, विरोधकांनी यावरून थेट सरकारवर हल्ला चढवला आहे.

महिला कल्याणाचा दावा करत असलेल्या सरकारने लाडकी बहिण’ योजनेतील आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करत काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. लाडकींना 2 हजार 100 रुपये देण्याचं वचन निवडणुकीआधी देण्यात आलं होतं. पण सत्तेत आल्यावर सरकारने आर्थिक कारणं सांगत हे वचन पाळण्यास नकार दिला. त्यामुळे लाखो महिलांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर उपरोधिक हल्ला चढवत म्हटलं, अपयशी लोकांना पहिला क्रमांक देण्याचा हा प्रकार आहे का.

Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त 

लाडकी योजना फसली

थोराट यांनी प्रश्न उपस्थित केला की, महिलांना गोंजवून ठेवण्यासाठीच महिला व बालविकास विभागाला हे स्थान देण्यात आलंय का? थोरात यांनी आरोप केला की, निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांची नावे हटवण्यात आली. आधीच कमी रकमेवर सुरू असलेली ही योजना आता अधिकच अपूर्ण झाली आहे. अनेक महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या खात्याला सर्वोत्कृष्ट ठरवण्यामागे निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक मिळाल्याबाबत थोरात म्हणाले, राज्यभर रस्त्यांवर खड्ड्यांची भरमार आहे. हेच खड्डे सरकारची आठवण करून देतात. मग अशा विभागाला दुसरा क्रमांक देणं म्हणजे नागरिकांची थट्टा आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच संतापाचं वातावरण आहे. तरीही कृषी विभागाला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. यावरही थोरात यांनी आक्षेप घेतला. मत्स्य व बंदरे विभागाला पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे.

Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज

वाहतूक विभागाची खिल्ली

मंत्री नीतेश राणे हे समाजात फूट पाडण्याचं महान कार्य करत आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांच्या खात्याला इतकं वरचं स्थान दिलं असावं असंही ते म्हणाले. एसटी महामंडळाची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. बसेस रस्त्यावर बंद पडत आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन नाही. देखभालीअभावी बसेस निष्क्रिय होत आहेत. तरीही परिवहन विभागालाही उत्तम कामगिरी म्हणून स्थान देण्यात आलं. यावर थोरातांनी उपहासात्मक टीका करत, सरकारच्या प्रगतिपुस्तकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

महायुती सरकारचा शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड जरी सादर झाला असला, तरी विरोधकांच्या मते ही एक गाजर दाखवण्याची रणनीती आहे. महिला, शेतकरी, वाहतूक यासारख्या जिव्हाळ्याच्या खात्यांमध्ये दाखवलेली प्रगती ही केवळ आकड्यांमध्येच मर्यादित असल्याचा दावा होत आहे.

Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!