महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : समृद्ध महाराष्ट्राला महायुतीने केले दिवाळखोर

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सरकारच्या नाकर्तेपणामुळे

Author

एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याने महायुती सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराचा केवळ 56 टक्के भाग मिळाला आहे. सुरक्षा रक्षकांना तर केवळ 50 टक्के वेतनावर समाधान मानावे लागणार आहे. निधीअभावी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आता विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महायुतीने दिवाळखोर केला समृद्ध महाराष्ट्र माझा, असे म्हणत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सपकाळ यांनी महायुती सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आणल्याचा आरोप केला. साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार पूर्णपणे देणे अशक्य झाले आहे. परिवहन महामंडळाला प्रत्येक महिन्याला 277 कोटी रुपयांची गरज असते, मात्र राज्य सरकारने केवळ 272 कोटींचा निधी मंजूर केला.

Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण 

मंत्र्यांमध्ये गँगवॉर सुरू

मंजूर केलेल्या निधीतून 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन अपूर्ण राहिले आहे. या परिस्थितीवर काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीचा आरोप केला आहे. सपकाळ यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढताना मंत्रीमंडळातील अंतर्गत संघर्षाकडे लक्ष वेधले. मंत्र्यांमध्ये पालकमंत्रीपदासाठी आणि आमदारांना निधी वाटपावरून गँगवॉर सुरू आहे. जनतेचा पैसा भ्रष्टाचाराने लुटला जात आहे. मात्र त्याचा फटका थेट राज्याच्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संकटावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के वेतन देणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मात्र यापुढे दर महिन्याच्या सात तारखेला संपूर्ण वेतन मिळेल याची जबाबदारी माझी असेल, असे सरनाईक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’

आर्थिक अडचणींमुळे मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यातील 13 कोटी नागरिकांसाठी सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा पुरवणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहीनी आहे. तिची प्रतिष्ठा जपण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!