
आगामी काळासाठी बहुजन समाज पार्टीची ताकद वाढवायची आहे. यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कामाला लागावं अशी सूचना बसपच्या नेत्या मायावती यांनी दिलेत.
देशातील बहुजनांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आणखी बळ द्यायला हवे. तळागाळातील शोषित, पीडित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्ष संघटन बळकट करावे लागेल, असे आदेश बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी दिलेत. राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पक्ष संघटनेच्या बैठकीत त्यांनी देशभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
बैठकीला पक्षाचे माहराष्ट्र राज्य महासचिव तथा पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी देखील उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेची त्यांनी माहिती दिली. देशभरातील वरिष्ठ पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. देशात आर्थिक विषमता वाढत आहे. जातीवाद वाढत आहे. सांप्रदायिकतेनं हाहा:कार निर्माण केला आहे. यावर मायावती यांनी बैठकीत चिंता व्यक्त केली. भांडवलशाही धोरणांमुळे गरीब मरज आहे. बहुजन समाजाचे शोषण होत आहे. सामाजिक, आर्थिक विषमता वाढली आहे. त्यामुळे गरीब आणखी गरीब होत आहे. यावर मायावती यांनी चिंता व्यक्त केली.

बहुजन व्हावे शासनकर्ते
बहुजनांना शासनकर्ता बनवायचे आहे. हेच बहुजन समाज पार्टीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कॉंग्रेस,भाजप, समाजवादी आणि इतर पक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार बहुजनांना त्यांचा हक्क दिला नाही. हा हक्क बहुजनांना मिळाला असता तर बहुजन समाज पक्ष स्थापन करण्याची गरजच पडली नसती. आता हा अन्याय दूर करण्यासाठी बसपा आणखी वेगानं काम करणार असलयाचं मायावती म्हणाले.
बहुजनांना केवळ दिखाव्यासाठी जवळ करण्याची नीती अनेक पक्षांची आहे. खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे काम या सर्वच पक्षांनी केले आहे. धनाढ्य, भांडवलदारांच्या इशाऱ्यावर हे पक्ष चालतात. त्यामुळं गरीब, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित आहेत. बहुजन चळवळ कमकुवत करण्यासाठी पक्ष फोडण्याचं काम केले जाते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरविली जाते. नेत्यांबद्दल अपप्रचार केला जातो. नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल आकास निर्माण करण्याचे काम केल जाईल, असंही मायावती म्हणाल्या.
दावोसमध्ये एका चिमुकल्याने मारला Devendra Fadnavis यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग
सावधगिरी गरजेची
बहुजन समाजाला गोंधळात टाकण्यासाठी षडयंत्र देखील होणार आहेत. या सर्व साम-दाम-दंड-भेद नितीपासून सावध राहण्याचे आवाहन देखील मायावती यांनी केले. संघटन शक्ती, कॅडर विस्तार गरजेचा आहे. आगामी निवडणुकीची तयारी या बैठकीत करण्याचे आदेश देण्यात आलेत. बसपाच्या मूळ तत्वांवर कायम राहावे. कुठल्याही दबावाखाली कोणीही येऊ नये. येता बहुजनांच्या हक्कासाठी लढण्याकरीता तन-मन-धन समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन मायावती यांनी केले. तरुणांचा सहभाग पक्षात गरजेचा आहे. आगामी निवडणुकीत चांगले प्रदर्शन करण्यासाठी रणनीती आखावी लागले. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बसप भांडवलशाहीवर आधारीत नाही. कॅडर आधारित पक्ष आहे. त्यामुळं याकडं लक्ष देण्याचं आवाहन देखील मायावती यांनी केलं.