महाराष्ट्र

Mohan Bhagawat : संघाच्या विचारधारेत आता सर्व धर्मांना स्थान

RSS : राष्ट्रीय एकतेच्या दिशेने मोहन भागवतांचा समरसतेचा संदेश

Author

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती आता केवळ धर्मापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती भारतीयत्वावर आधारलेली आहे. मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली संघ आता सर्व धर्म, जाती आणि पंथांच्या नागरिकांना सामावून घेणाऱ्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर जोर देत एक महत्त्वपूर्ण विधान केल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे. विविध मतधारणांमध्ये गुंतलेल्या भारतात संघाच्या भूमिकेबाबत अनेक समज-गैरसमज पसरलेले असतानाच, मोहन भागवत यांच्या ताज्या भूमिकेमुळे संवाद आणि समन्वयाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे आहेत.

 

वाराणसी दौऱ्यादरम्यान भागवत यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे फक्त एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी खुले आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्ती या समान धाग्यांवर आधारित संघटनेची व्याख्या केली असून, प्रत्येक धर्म, पंथ आणि जातीतील व्यक्तींना संघाच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे खुले आमंत्रण दिले आहे.

Nagpur : रामाच्या रथयात्रेला रहमानचे सलाम

सर्वधर्म समभाव दृष्टिकोन

 

भागवत यांनी स्पष्ट केले की, संघाच्या शाखांमध्ये सामील होण्यासाठी कोणताही व्यक्ती भारत माता विषयी आदर बाळगणारा आणि राष्ट्रीय चिन्हांविषयी निष्ठा ठेवणारा असावा. अशा मूल्यांवर आधारित कोणताही नागरिक संघाच्या विचारधारेत स्थान मिळवू शकतो. त्यांनी विशेषतः भगव्या ध्वजाचा आदर आणि “भारत माता की जय” या घोषणेप्रती असलेली आस्था ही संघाच्या संस्कृतीचा मूलभूत भाग असल्याचे नमूद केले.

 

मोहन भागवत यांच्या या भूमिकेने संघाने आपली दृष्टी अधिक व्यापक केली आहे. भारताच्या सांस्कृतिक विविधतेतून निर्माण होणाऱ्या एकात्मतेचा आदर्श प्रस्तुत केला आहे. केवळ धार्मिक आधारावर समाजाचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने संघाचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जातो.

Anil Deshmukh : ईव्हीएमवर जिंकणारा, बॅलेट पेपरवर हरला 

समाजहिताचे व्यापक विचार

 

वाराणसीतील नागर कॉलनी येथील शाखा दौऱ्यात भागवत यांनी केवळ धार्मिक समावेशकतेवर नव्हे तर इतर सामाजिक मुद्द्यांवरही सडेतोड मते मांडली. त्यांनी पर्यावरण संरक्षण, आर्थिक स्वावलंबन, आणि जातीय भेदभाव निर्मूलनाच्या दिशेने संघाच्या कार्यावर भर दिला. मजबूत समाजव्यवस्था ही फक्त विचारसरणीतून नव्हे, तर सामूहिक कृतीतून घडते, यावर त्यांनी भर दिला.

 

भारतीय संस्कृती ही केवळ धार्मिक परंपरांचा समुच्चय नाही. ती एक सजीव मूल्यव्यवस्था आहे, जी सर्व धर्मांना आपल्यात सामावून घेते, असा विचार या संपूर्ण दौऱ्यातून पुढे आला. मोहन भागवत यांची ही भूमिका संघाच्या बदलत्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे, जी नव्या युगात एका सर्वसमावेशक राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने पाऊल टाकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!