महाराष्ट्र

Ajit Pawar : प्रकल्प आहे की बकासूर; गोसेखुर्दसाठी आणखी निधी

Gosikhurd project : अजित पवारांनी अंतिम मुदत जाहीर केली

Author

गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी राज्य सरकारने वाढीव निधी जाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा केली.

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 10 मार्च रोजी मुंबईतील विधान भवनात पार पडले. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या जलसंपत्ती विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः विदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून लांबणीवर आहे. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला वाढीव निधी देत जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. 40 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आता आणखी गती दिली जाणार आहे.

Ajit Pawar : अकोल्याच्या विमानतळासाठी निधी ‘आवश्यक असेल तर’..

विदर्भाचा विस्तार

राज्यातील जलसंपत्तीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी थेट बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेतला गेला होता. महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतर्गत हे काम हाती घेण्यात आले होते. या निर्णयामुळे विदर्भातील सात जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या पीएम किसान सन्मान निधीच्या वितरण समारंभातही फडणवीस यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांची माहिती दिली होती.

प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे विदर्भातील जलसंपत्ती व्यवस्थापनाला नवसंजीवनी मिळणार आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प रखडलेला आहे. याच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे आले आहेत. भूसंपादनाची समस्या, निधीअभावी रखडलेले काम, रेल्वे क्रॉसिंग प्रलंबित असणे यांसारख्या अडचणीमुळे हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही

विकासाला चालना

सरकारच्या नियोजनानुसार, 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प नवसंजीवनी ठरणार आहे. या जलसिंचन प्रकल्पामुळे नवा रोजगार निर्माण होईल, शेतीच्या उत्पादनात मोठी वाढ होईल आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल.

गोसीखुर्द प्रकल्पाच्या अनेक मुदती पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र, आता सरकारने ठोस पावले उचलत अंतिम मुदत ठरवली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी निधी आणि प्रशासनाचे सहकार्य असेल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागला तर विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणावर सुधारण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!