प्रशासन

विदर्भातील Bus Passengers यांना ‘दे धक्का’ प्रवास

मुंबईला AC तर, विदर्भाला No Warranty भंगार बसेस

Author

विदर्भातील एसटी बससेवा म्हणजे धोकादायक प्रवासाचा नमुना बनली आहे.

विदर्भातील एसटी महामंडळाच्या बससेवेची दयनीय अवस्था दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. प्रवासादरम्यान रस्त्यातच बंद पडणाऱ्या जर्जर बसगाड्या, गुळगुळीत व धोकादायक टायर्स, अक्षरशः हलणाऱ्या बसच्या बॉडी आणि प्रवाशांचे वाढते हाल यामुळे विदर्भातील जनतेचा संयम सुटला आहे. विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या भागांमध्ये अत्याधुनिक बसेस धावत असताना विदर्भात मात्र जुनाट, मोडकळीस आलेल्या बसेस पाठवल्या जात असल्याने एसटी महामंडळावर अन्यायाचा आरोप होत आहे.

तिरोडा आगाराची तिरोडा-गोरेगाव बस बुधवारी कुन्हाडी येथे अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला. रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर प्रवाशांनाच बसला धक्का देऊन ती बाजूला करावी लागली. हा प्रकार केवळ एकटा नसून, विदर्भात दररोज शेकडो प्रवासी अशाच परिस्थितीला सामोरे जात आहेत. प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र आहे.

नागपूरच्या विकासाला Break; दीडशे मीटरचा रस्ता, दीड वर्षाचा प्रवास

विदर्भासाठीच ‘भंगार’ बसेस का

राज्यातील एसटी बससेवा पाहता, मुंबई-पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात नवनवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतात. अत्याधुनिक वातानुकूलित बसेस, शिवनेरी, शिवशाही यांसारख्या सेवांनी प्रवाशांना उत्तम सुविधा मिळत आहेत. परंतु विदर्भातील प्रवाशांना मात्र मोडकळीस आलेल्या, केव्हाही बंद पडणाऱ्या आणि जीवघेण्या बसेसच दिल्या जात आहेत.

विदर्भाच्या वाट्याला कायमच ही दुय्यम वागणूक का? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
एसटी महामंडळाच्या भंडारा विभागातील 375 बसेसपैकी जवळपास 80 % बसेस जुन्या आहेत. त्यातील बहुतांश बसेस अपुऱ्या देखभालीमुळे धोकादायक बनल्या आहेत. प्रवासादरम्यान छप्पर उडण्याचे प्रकार घडत आहेत, इंजिन अचानक बंद पडण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. मात्र तरीही प्रशासन आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

देवभाऊंच्या One State, One Registration प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा

सरकारची उदासीनता

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळावर आर्थिक संकट आहे. हे जरी खरे असले तरी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर शहरी भागांमध्ये बससेवा सुधारली जात आहे. मग विदर्भावर अन्याय का? शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

विदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. तुटपुंज्या सुविधा, अपुऱ्या देखभालीमुळे प्रवासादरम्यान त्यांनाही तणाव सहन करावा लागतो. तरीही वरिष्ठ अधिकारी आणि सरकार केवळ घोषणांपलीकडे काही करत नाहीत.

इलेक्शन नंतर आता Narendra Modi करतील निवडणूक आयुक्तांचे सिलेक्शन

सुधारणा कधी होणार

प्रवाशांची मागणी स्पष्ट आहे जुन्या, धोकादायक बस हटवून नवीन आणि सुरक्षित बसेस विदर्भात चालवण्यात याव्यात. सार्वजनिक वाहतुकीच्या मूलभूत गरजा पूर्ण न करणे म्हणजेच सरकारचा या भागाकडे असलेला हलगर्जीपणा दाखवतो.

विदर्भ हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असूनही, त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. एसटी महामंडळ आणि सरकारने त्वरित पावले उचलून विदर्भातील प्रवाशांसाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी. नाही तर प्रवाशांमध्ये असंतोष वाढून मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!