
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाला आव्हान देत काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजपच्या दोन आमदारांवर गैरप्रकाराच्या आरोपांसह न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार पुनरागमन करत 288 पैकी 231 जागांवर विजय मिळवला. मात्र, काँग्रेससाठी हा पराभव पचवणं सोपं नव्हतं. पराभवाचा स्वीकार करण्याऐवजी, त्यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. काँग्रेसच्या दोन पराभूत उमेदवारांनी भाजपच्या विजयी आमदारांवर निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली आहे.
आम्ही पराभूत झालो? अजूनही विश्वास बसत नाही. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला असला तरी त्यात अस्वस्थतेची झाक स्पष्ट जाणवते. २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघात भाजपच्या राजेश वानखडे यांनी ठाकूर यांचा अनपेक्षित विजय मिळवला. अगदी मोदींच्या कार्यकाळातही टिकून राहिलेल्या ठाकूर यांचा पराभव यंदा कसा झाला? हीच शंका मनात घेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

मतदार संख्येतील वाढ
यशोमती ठाकूरच नाही, तर आकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मनीष गणगणे यात शामिल आहेत. त्यांनीही निवडणूक निकालाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकांवर न्यायालयाने भाजपचे तिवसा मतदारसंघातील आमदार राजेश वानखडे आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना समन्स बजावले आहेत. तीन आठवड्यांत त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती, असे म्हणत त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणतात, ईव्हीएमने निवडणूक घेण्याची अधिकृत अधिसूचना नव्हती, मग याचा वापर का झाला? लोकसभा निवडणुकीनंतर अचानक मतदारसंख्या का वाढली. विशेष म्हणजे ही वाढ झालेली मते फक्त महायुतीच्या उमेदवारांनाच कशी मिळाली.
Parinay Fuke : ऐतिहासिक निर्णयाने भ्रष्टाचाराला आळा, गरीब मुस्लिमांना न्याय
ईव्हीएमचा वाद अजूनही
इतकेच नव्हे, तर निवडणुकीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. व्हीव्हीपॅट मशीनच्या चाचण्या व्यवस्थित पार पडल्या का याची शहानिशा न करता निवडणूक निकाल घोषित करण्यात आला, असा त्यांचा आरोप आहे. काँग्रेसचे मनीष गणगणे यांचे म्हणणे आहे की, मतमोजणीदरम्यान पारदर्शकता राखण्यात आली नसल्यामुळेच ते पराभूत झाले. आकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांनी त्यांचा पराभव केला असला तरी त्यांनी या विजयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले आणि सरकार स्थापन करून तीन महिनेही पूर्ण केले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला आहे. तरीही निवडणूक निकालांवरचा संशय अद्यापही कायम आहे. अनेक ठिकाणी निवडणूक निकालांविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत. काही मतदारसंघांमध्ये फेरतपासणीची मागणीही होत आहे.