महाराष्ट्र

Devendra Fadanvis : बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेतले जाईल

Nagpur : घोटाळा गृहनगरात, शिक्षा मात्र राज्यभर

Author

मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राला हादरा दिला आहे. या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत.

राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात एक मोठा शिक्षण घोटाळा उघड झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानेही याला दुजोरा दिला आहे. या बोगस शिक्षकांनी मिळवलेले लाखो रुपयांचे वेतन, हे सरकारी तिजोरीसाठी आर्थिक भस्मासूर ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीने कसून चौकशीचे आदेश दिले आहेत.

घोटाळा प्रकरणात काही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात कडक कारवाईदेखील सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत पोलिसांना सांगितले आहे की कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घालू नका. विशेष म्हणजे, दोषी आढळणाऱ्या बोगस शिक्षकांकडून मिळालेले वेतन परत घेण्याचाही विचार केला जात आहे. या पद्धतीने शेकडो शिक्षकांनी बनावट कागदपत्रे तयार करून शालार्थ आयडी प्राप्त केली आणि आपली नियुक्ती सुनिश्चित केली. या 580 बोगस नियुक्त्या रद्द करण्याची शक्यता आता प्रबळ होत आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने फुललं एकल शाळांचं ज्ञानवृक्ष

बनावट कागदपत्रांचा वापर

राज्यातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या घोटाळ्यांची पुनरावृत्ती झाली आहे का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याचा आणखी एक गंभीर पैलू समोर आला आहे.ती म्हणजे प्रत्येक नियुक्तीसाठी घेण्यात आलेली लाखांची रक्कम. एका अपात्र शिक्षकाची नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी 20 ते 35 लाख रुपये इतकी लाच घेतल्या गेल्या असल्याचे समोर आले आहे. हे पैसे कोणाकडून घेतले गेले आणि कोठे व कसे हस्तांतरित झाले, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. इतकेच नव्हे, तर या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या पगाराच्या नोंदी तपासण्याचाही निर्णय घेतला गेला आहे.

शिक्षण घोटाळा प्रकरणात आता आणखी एक तक्रार दाखल झाल्याने प्रकरणाला वेग मिळाला आहे. सदर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नव्या तक्रारीत भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी आणि कार्याध्यक्ष हेमंत बांडेबुचे यांनी दिली आहे. शिक्षण संस्थाचालक, तत्कालीन विभागीय उपसंचालक वैशाली जामदार, माजी मुख्याध्यापिका कमल कटारे आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात ती दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Akola MSEDCL : आमदाराशी मतभेद; एसई काही रुजू होईना

बोगस भरती, बनावट कागदपत्रे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने शैक्षणिक दर्जा धोक्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात थेट लक्ष घालून कारवाईचा निर्धार दाखवला आहे. दोषींवर कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!