महाराष्ट्र

Nagpur : न्यायाच्या वाटेवर शेतकरी, आंदोलनाच्या उंबरठ्यावर काँग्रेस

Cooperative Bank Fraud : सुनील केदार विरोधात पुन्हा एकदा कारवाईची मागणी

Post View : 49

Author

2001-02 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना अटक करण्यात आली होती.

नागपूरमध्ये पुन्हा एकदा सुनील केदार यांच्या नावावरून चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. 2001-02 वर्षी झालेल्या सुमारे 150 कोटी रुपयांच्या मोठ्या बँक घोटाळ्याचा वाद अजूनही शमलेला नाही. या घोटाळ्याच्या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या सुनील केदार यांना आधीच पाच वर्षांची शिक्षा झाली होती. तरीही हा वाद लोकांच्या लक्षात अजूनही ताज्या स्वरूपात आहे. सध्या काँग्रेसचे काही कार्यकर्ते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत.

आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव मुजीब पठाण करत आहेत. पठाण यांनी सांगितले की, या बँकेतील 149 कोटींच्या घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करावा. जेणेकरून शेतकऱ्यांचे घातलेले पैसे परत मिळू शकतील. या मोहिमेत साठाहून अधिक कार्यकर्ते बुट्टीबोरी पोलिस स्थानकाच्या समोर मोर्चा काढताना दिसले. अशा आंदोलनामागे एक कारण म्हणजे काही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी मेळाव्यात निमंत्रण न देण्यात आल्याने गटातील असंतोष देखील सामावलेला आहे.

Mohan Bhagwat : मोदींच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला शिवभक्तांचा थेट फटका

उपोषणाची तयारी सुरू

मुजीब पठाण यांनी म्हटले की, या घोटाळ्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी त्यांच्या मेहनतीच्या पैशांमुळे प्राणही गमावले आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनील केदार यांच्याकडून दीडशे कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला आहे. या पैशांची परतफेड शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस विभागाला याबाबत निवेदन दिले असून, पैसे मिळेपर्यंत आंदोलन करणार आहोत. या घोटाळ्याच्या प्रकरणात सुनील केदार हे मुख्य आरोपी आहेत.

2001-02 मध्ये बँकेच्या अध्यक्ष पदावर असताना, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद येथील काही कंपन्यांनी बँकेकडून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केली होती. मात्र, त्या कंपन्यांनी सरकारी रोखे दिली नाहीत तसेच बँकेची रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी केदारसह अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी सुनील केदार आणि पाच इतर आरोपींना 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. मुजीब पठाण यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचे हक्क वसूल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. उपोषणाचा पर्यायही आम्ही वापरण्यास तयार आहोत. हे पैसे शेतकरी, सामान्य नागरिकांची मेहनत आणि स्वप्ने आहेत. जे परत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

Rohit Pawar : निवडणूक आयोग म्हणजे गिरे तो भी टांगा ऊपर

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!