प्रशासन

Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

Digital Communication : पावसाळी अडचणींना नागपुर महावितरणच्या स्मार्ट टेक्नॉलॉजीने दिला जवाब

Author

विदर्भात अवकाळी पावसामुळे सतत ठप्प होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नागपूर महावितरण विभागाकडून ठोस उपक्रम राबविल्या जात आहे.

विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या उंचीवर पोहोचले असताना, अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या अनपेक्षित पावसामुळे सामान्य नागरिकांमध्ये गंभीर त्रास निर्माण झाला असून, विशेषतः विदर्भातील काही भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी फक्त पाच ते दहा मिनिटे किंवा अर्धा तास पाऊस पडला तरी वीजपुरवठा बंद होत असून, त्यामुळे अंधार पसरून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अश्या परिस्थितीत अजूनही काही जिल्ह्यांमध्ये रस्त्यांचा विकास न झाल्याने पावसाळ्याच्या हंगामात रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे.

अनेक समस्या लक्षात घेऊनही महावितरण आणि महापालिकेकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तत्पर कारवाई दिसून येत नव्हती. मात्र नागपूर शहरात यापुढे परिस्थिती सुधारण्याचा महत्त्वाचा उपक्रम राबविला जात आहे. या नव्या योजनेतून नागरिकांच्या समस्या त्वरेने सोडवण्यासाठी महावितरण विभागाने खास व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. ज्यामुळे वीजपुरवठ्यातील कोणताही तांत्रिक अडथळा किंवा शटडाऊन लगेच लक्षात येतो. नागपूर शहरातील महावितरण विभागाने शहरभरातील मोठ्या व्यापावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक उपविभागनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. यामध्ये शटडाऊनची माहिती, तांत्रिक बिघाड, आणि आवश्यक उपाययोजनांची तातडीने माहिती सामायिक केली जाते.

Buldhana : शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विभागाचे भरारी पथके मैदानात

मान्सूनपूर्व तयारी

ग्रुपमध्ये पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, तसेच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. हे ग्रुप “ओन्ली फॉर अॅडमिन” प्रकारात असल्यामुळे माहिती व्यवस्थापन अधिक सुरळीत होते. नागपूर प्रमाणेच, अकोला सारख्या शहरांमध्येही अशा प्रकारचे उपविभागनिहाय ग्रुप तयार करण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरू शकतो. मानेवाडा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने आणि सहाय्यक अभियंता सोनल गोस्वामी यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. यामुळे नागपूरच्या नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत तत्काळ माहिती मिळते. वीज का बंद आहे, कधी सुरू होईल, याची माहिती वेळेत मिळाल्यामुळे नागरिकांची वेळ वाचते व अडचणी कमी होतात. या पद्धतीला मोठी सकारात्मक दखल मिळाली आहे.

विशेष म्हणजे, मान्सून हंगाम सुरू होण्यापूर्वीच हा उपक्रम राबवला गेला आहे, ज्यामुळे मुसळधार पावसाच्या वेळी नागरिकांना योग्य तयारी करता येईल. अशा स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे नागरिक व वीजपुरवठा विभाग यांच्यातील संवाद वाढल्याने वीजपुरवठ्याच्या समस्यांवर त्वरीत नियंत्रण मिळवणे शक्य होईल. विदर्भातील पावसाळी अडचणींमध्येही ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे या प्रकारच्या उपक्रमांना महावितरण आणि महापालिका अधिकाधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात या क्षेत्रातील लोकांनाही या समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल. विदर्भातील नागरिकांच्या सुरक्षितता आणि जीवनमान सुधारण्यासाठी अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे उपक्रम निश्चितच एक प्रेरणादायी पाऊल आहे. यामुळे नागरिकांच्या वेदना समजून घेतल्या जात आहेत. त्यांच्या समस्या जलदगतीने सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जे नक्कीच क्षेत्राच्या विकासासाठी मोठा मीलाचा दगड ठरणार आहे.

Teacher Recruitment Scam : नागपूरच्या माजी उपसंचालकाला अटक

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!