प्रशासन

स्वच्छता अभियानात NMC जोशात; पुराचे पाणी मात्र यंदाही नाकात

धोकादायक पुलांचं ठरणार भवितव्य

Author

नागपूर महानगरपालिका 7 फेब्रुवारीपासून शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नद्यांची वार्षिक स्वच्छता मोहीम सुरू करणार आहे.

पावसाळ्याआधी तयारी म्हणून नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचे पाऊल उचलेल आहे. नागपूर महानगरपालिका 7 फेब्रुवारीपासून नाग, पिवळी आणि पोहरा नद्यांची वार्षिक स्वच्छता मोहीम सुरू करणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी स्वच्छतेची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. मंगळवारी झालेल्या बैठकीत अभियानाची व्याप्ती आणि अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सांगितले की, नाग नदी 16.58 किलोमीटर, पिवळी नदी 17.42 किलोमीटर आणि पोहरा नदी 15.17 किलोमीटर असतील.

या मोहीमेसाठी सात टप्प्यांत काम केले जाईल, ज्यामध्ये सात पोकलेन मशीन तैनात केली जाणार आहेत. आयुक्त अभिजीत चौधरी यांनी स्वच्छतेच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले. आवश्यक असल्यास अतिरिक्त यंत्रसामग्री तैनात करून पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नदी-नाले सफाईच्या कामावर लक्ष केंद्रित करून शहरातील पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने निर्णय घेतले.

देवभाऊ आणखी वेगाने करणार Digital Maharashtra

तयारीवर प्रश्नचिन्ह

महापालिकेने पुराचा धोका असलेल्या पुलांची ओळख करून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच काढलेला गाळ नदीपात्रात परत न येण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. 23 सप्टेंबर 2023 च्या अचानक पुरामुळे अंबाझरी धरणाच्या खाली आणि नाग नदीच्या काठावरील क्षेत्रांना मोठे नुकसान झाले होते. 20 जुलै 2023 रोजी दक्षिण नागपूरमध्ये स्ट्रॉम ड्रेन अडवल्याने तीव्र पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने नदी आणि नाल्यांची स्वच्छता महत्त्वाची मानली आहे. 13 नाले स्वच्छ केले जात असून, आणखी 15 नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

मोठ्या महापालिकांना हो हो, तर लहान महापालिकांना नो नो 

गेल्या दोन वर्षांपासून नागपूरच्या नाग नदीला पूराचा सामना करावा लागतो आहे, पण महापालिकेने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास शहरात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरते, ज्यामुळे नाग नदीच्या काठावर राहणाऱ्यांना दरवर्षी समस्यांना सामोरे जावे लागते. महापालिकेने जरी पावसाळ्याच्या तयारीसाठी काही पावले उचलली असली, तरी पावसादरम्यान पाणी साचल्यास जवाबदार कोण? हे मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!