प्रशासन

नागपुर सुविधा तक्रार निवारण हेल्पलाइनला आला वेग

पहिल्याच दिवशी मिळाल्या 143 तक्रारी

Author

नागपुर महानगरपालिकेने सुरू केलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर पहिल्याच दिवशी 143 तक्रारी नोंदवण्यात आल्या.

मात्र सुरू केलेल्या नागरिक सुविधा तक्रार निवारण हेल्पलाइनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हेल्पलाइनच्या पहिल्याच दिवशी 143 तक्रारी नोंदवण्यात आल्या. यात सर्वाधिक तक्रारी सीवेज ओव्हरफ्लो आणि चोकिंग संदर्भातील आहेत. याशिवाय कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील दिवे बंद असणे, झाडे कोसळणे, तसेच मोबाइल टॉवर परवानगी यांसारख्या समस्यांबाबतही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

हेल्पलाइनवर सर्वाधिक 18 तक्रारी सीवेज चोकिंग आणि ओव्हरफ्लो संदर्भात नोंदल्या गेल्या आहेत. लक्ष्मीनगर झोनमधील चूना भट्टी परिसरातील सीवेज चोकिंगबाबतही तक्रारी आल्या आहेत. याशिवाय मेनहोलच्या झाकणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी नागरिकांनी आवाज उठवला आहे. महानगरपालिका प्रशासनाने या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेंचा वार; 2047 पर्यंत Congress होणार हद्दपार 

अवैध बांधकामांवरही आली पहिली तक्रार

शहरातील अवैध बांधकाम आणि नियोजित विकासाचा दुरुपयोग याविरोधात पहिली तक्रार लकडगंज वार्ड क्रमांक 23 मधून आली. साप्ताहिक बाजारातून होणाऱ्या अतिक्रमणाबाबत मनपाचे लक्ष वेधले आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन 155304 सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सोमवार ते शुक्रवार उपलब्ध राहील. शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत कार्यरत असेल.

सत्ता स्थापन करू शकतो लक्षात आल्यानंतर Uddhav Thackeray यांनी बदलला रंग

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हेल्पलाइनचे उद्घाटन करण्यात आले आहे. दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यांना तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तक्रारीची नोंद घेऊन ती संबंधित विभागाला पाठवण्यापासून ते तक्रारदारांचा फीडबॅक घेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया दक्षतेने करण्यात येत आहे.

महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट देऊन कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन केले. तक्रार निवारण प्रक्रियेचा आढावा घेत त्यांनी त्वरित कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
महानगरपालिकेच्या या नव्या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवण्याचा मार्ग खुला झाला आहे.

मात्र यात एक प्रश्न निर्माण होतांना दिसत आहे. हेल्पलाईन सुरू होण्याआधी आतापर्यंत या समस्यांवर उपाययोजना का सुरू केली गेली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. याआधी प्रशासनाचे याकडे लक्ष का गेले नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!