प्रशासन

Nagpur : महावितरणला गडकरी, फडणवीसांचा ‘हाय व्होल्टेज’ झटका

Devendra Fadnavis : विजेच्या खेळखंडोबामुळे ऊर्जामंत्र्यांचे शहरच अंधारात

Author

विदर्भात अवकाळी पावसामुळे वाढलेल्या विजेच्या तुटवड्यामुळे नागपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महावितरणवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे जनजीवन आधीच विस्कळीत झाले असताना, त्यातच विजेच्या लपंडावाने नागपूरकरांची झोप उडवली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांप्रमाणेच नागपूर शहरातही वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः ऊर्जामंत्री देखील आहेत. अशा स्थितीत नागपूरकरांच्या समस्या ऐकून न घेणे शक्यच नव्हते.

रविवारी (22 जून रोजी) नागपूरच्या हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विषयावर विशेष चर्चा झाली.शहरातील वीजपुरवठ्याच्या वारंवार होणाऱ्या खंडिततेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या कार्यशैलीवर थेट सवाल उपस्थित केला. नागपूरसारख्या मोठ्या शहरात दिवसा किंवा रात्री कधीही वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उकाड्याच्या रात्री विजेचा खेळखंडोबा होत असल्याने लोकांच्या नाराजीला सीमाच उरलेली नाही.

Nag River : पावसाचं धरण फुटायच्या आधीच नागपूर बुडण्याच्या उंबरठ्यावर

विकास कामांचा आढावा

बैठकीत अनेक आमदारांनी वीजपुरवठ्याच्या अडचणींवर प्रकाश टाकत फडणवीस यांचे लक्ष वेधले. महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता, त्यांच्या उत्तरांमध्ये समाधानाचा अभाव असल्यामुळे फडणवीस आणि गडकरी यांनी संताप व्यक्त करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. महावितरणने शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. परंतु या खोदकामांमुळे अनेक ठिकाणी केबल्स तुटत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र या कारणावर नेतेमंडळी समाधानी नव्हते. शहरातील वीजपुरवठ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले.

खऱ्या अर्थाने संताप उसळला तो रस्त्यांच्या स्थितीवरून. गडकरींनी खोदकाम झाल्यानंतर रस्ते पूर्ववत न केल्याबद्दल महावितरणवर ताशेरे ओढले. अधिकाऱ्यांनी ‘रस्ते पूर्ववत केले जात आहेत’ असे सांगितले असले तरी, गडकरींनी कंत्राटदारांना स्पष्ट निर्देश देण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट केली.या बैठकीत विकासकामांबाबत एकंदरीत आढावा घेण्यात आला, मात्र वीजपुरवठ्याच्या प्रश्नांमुळे बैठक विशेष गाजली. नागपूर हे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे शहर असतानाही येथेच विजेची परिस्थिती इतकी बिघडलेली असेल तर राज्यातील इतर भागांची काय स्थिती असेल, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.

Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!