
नागपुरातील पोद्दारेश्वर रामनवमी मिरवणुकीदरम्यान हिंदू मुस्लिम बांधवांचे एक अनोखं दृश्य पाहायला मिळाले.
नागपूर येथील पोद्दारेश्वर राम मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून शतकाहून अधिक काळ उभे आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील लोकांसाठी हे मंदिर श्रद्धा आणि सामाजिक सौहार्दाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही हे मंदिर विशेष स्थान राखून आहे. यंदाही रामनवमीच्या निमित्ताने येथे नित्यनेमाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरले मुस्लिम बांधवांचे सहकार्य. त्यांनी शोभायात्रेचे स्वागत अनोख्या पद्धतीने कबुतर उडवून आणि फुलांची उधळण करून केले.
दरवर्षी होणाऱ्या या शोभायात्रेत हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि आपापल्या परंपरेनुसार सद्भावनेचा संदेश देतात. यावर्षी देखील नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांनी या शोभायात्रेचे स्वागत फुलांची उधळण करून केले. हे दृश्य फक्त नागपूरपुरते मर्यादित नसून धार्मिक सौहार्दाचे एक उत्तम उदाहरण म्हणून संपूर्ण देशासमोर आले. काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादामुळे शहरात तणावाचे वातावरण होते.

Ram Navami : बटोगे तो कटोगे म्हणणारेच साजिद खान यांच्या मंचावर
एकात्मतेचा संदेश
नागपुरतं संचारबंदी लागू करण्यात आली होती. समाजात तणाव निर्माण झाला होता. मात्र, रामनवमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक सकारात्मक संदेश देण्यात आला. रामनवमीच्या शोभायात्रेच्या मार्गावर मुस्लिम समाजाच्या लोकांनी भाविकांवर पुष्पवृष्टी केली. मुस्लिम सेवा समितीच्या सदस्यांनी हा उपक्रम हाती घेतला. एका सदस्याने सांगितले की, नागपूर हे बंधुभावाचे प्रतीक आहे आणि आम्ही दरवर्षी हा उत्सव साजरा करत असतो. आमच्या हिंदू बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबीच्या वेळी आम्हाला प्रेमाने स्वागत केले, त्यामुळे आम्हीही याच प्रेमभावनेतून हा उपक्रम राबवतो.
एका व्यक्तीने सांगितले की, आमच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे 1993 पासून आम्ही ही परंपरा पाळत आहोत. यामुळे संपूर्ण समाजात एकतेचा संदेश जातो आणि बंधुभाव वाढतो. सर्व सण एकत्र साजरे करण्याची हीच खरी भारतीय संस्कृती आहे. कोविड महामारीच्या काळातील विश्रांती वगळता, गेल्या 58 वर्षांपासून भगवान रामाची रथयात्रा भव्य स्वरूपात काढण्यात येते. विशेष म्हणजे, ही मिरवणूक अल्पसंख्याकबहुल भागांमधून जात असताना मुस्लिम बांधव स्वतःहून सहभागी होतात आणि प्रेमाने भगवान रामाच्या रथावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात.
Ramdas Tadas : माजी खासदारांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला