
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर नाना पाटोळे यांनी केले भाष्य. तर महायुती सरकारवर केली टीका.
राज्यात पार पडेलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते. त्यानंतर काँग्रेसने राज्यात परत मोठी मुसंडी मारली आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. या विजयाचे काही श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नाना पाटोळे यांचेच नेतृत्व असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर काँग्रेस मधूनच नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याच्या अनेक चर्चा पुढे आल्या. त्यावरून आता नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करीत स्पष्टीकरण दिले आहे. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही सांगितले आहे की मला या जबाबदारीतून मुक्त करा, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस विचारांनी या देशाला उभे केले आहे. ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई देशात सुरू झाली तेंव्हा देश उभा झाला. आम्ही स्मार्ट आहोत, ज्या लोकांना लोकशाही वाचवायची आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे. आज त्यांची वेळ आहे उद्या आमची वेळ येईल. मात्र हे केवळ फोटो सेशनसाठी नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी राज्य सरकारला लगावला.आपल्या राज्यात जेवढी लोकसंख्या देखील नाही त्यापेक्षा अधिक मतदार आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी मतदार यादीवर संशय व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मानी कारखान्यामध्ये स्फोट झाला. त्या कारखान्यात आरडीएक्स तयार होतं. त्यात अपरेंटिस पाठविले जातात. त्या ठिकाणी 60 वर्षाचे यंत्र आहेत, अलीकडची ही दुसरी घटना आहे, असे सांगत नाना पटोले यांनी भंडाऱ्यात झालेल्या स्फोटावरही भाष्य केले आहे.

नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम
दौऱ्याची गरज नव्हती
केंद्र सरकारवर बॉण्ड बद्दल कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. मात्र त्यांची गेंड्याची कातडी असल्याचे नाना पटोले म्हणाले. सोयाबीनची खरेदी बंद झाली, पाऊस खरेदी बंद, तुरीचे इम्पोर्ट केले. त्यामुळे किंमत पडली आहे. दावोसमध्ये जाऊन गुंतवणूक आणण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. काही कंपनी विदेशातील असल्या तरी इतर सर्व कंपन्या भारतातल्याच आहेत. .बिअर आणि दारू तयार करणारे कंपन्या राज्यात आणल्या. महाराष्ट्राला दारूचे राष्ट्र बनवायचे आहे का? असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांनी आणलेली गुंतवणूक कुठे गेली, त्यातून जनतेला किती रोजगार मिळाले? लाखो कोटींची जमीन उद्योगाच्या नावावर नाममात्र किमतीवर देत आहेत. राज्य कर्जबाजारी आहे. हे राज्य लुटू नका, राज्य सांभाळा, राज्य बरबाद करण्यासाठी नाही, असा शब्दांत नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली.