महाराष्ट्र

Nana Patole : ईडीचा वापर करून सुडाची खेळी

National Herald case : नाना पटोले भिडले दिल्लीच्या तख्ताशी

Author

राजकीय सूडाच्या आरोपांची लाट पुन्हा उसळली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या निमित्ताने आमदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत काँग्रेसच्या लढ्याला नवी धार दिली आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजप सरकारवर सडेतोड हल्ला चढवला आहे. नाना पटोलेंनी स्पष्ट केलं की, हे केवळ कायदेशीर कारवाईचं प्रकरण नाही. प्रत्यक्षात हे राजकीय सूडाचे कारस्थान आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी जोरदार टीका करत, ईडीचा गैरवापर करून विरोधकांना दडपण्याचा भाजपचा डाव असल्याचा ठपका ठेवला.

नाना पटोले म्हणाले की, हे काही पहिल्यांदाच घडत नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर अशा प्रकारे खोट्या आरोपांच्या कारवाया सुरू आहेत. मात्र, ईडीला यापूर्वीही काहीच सापडलेलं नाही आणि याहीवेळी काही मिळणार नाही, कारण ह्या प्रकरणात काहीच गैरकायदेशीर घडलं नाही.

Raj Thackeray : हृदयात मराठी, ओठांवर बंड

राजकीय शस्त्रासारखा वापर

राजकारणात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय संस्था भाजपच्या हाती सत्ताधारी शस्त्र बनल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यांनी भाजपवर आरोप केला की, ईडी, सीबीआय यांसारख्या संस्था आता स्वतंत्र राहिलेल्या नाहीत. भाजपला ज्या व्यक्तींचा आवाज सहन होत नाही, त्यांच्यावर अशा संस्थांचा वापर करून दबाव आणला जातो.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण म्हणजे भाजपची राजकीय घाबराट आहे. राहुल गांधी यांच्यावरील देशभरात वाढती लोकप्रियता पाहून सरकारचे डोके फिरल्याचे पटोले यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, औद्योगिक पडझड यावरून लक्ष हटवण्यासाठी अशा मुद्द्यांचा वापर होत असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे.

Nagpur : सिस्टमला ‘बायपास’ करणारा घोटाळा 

लढ्याची नवी दिशा

नाना पटोले यांनी ही घटना काँग्रेससाठी नवी दिशा ठरणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र होणार आहे. भाजप सरकारच्या दडपशाहीला काँग्रेस मुळीच झुकणार नाही, उलट अशा घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे हे विधान भाजप सरकारसाठी मोठा राजकीय अडथळा ठरू शकतो. पुढील काळात या प्रकरणातून निर्माण होणाऱ्या राजकीय खदखदीमुळे केंद्रात विरोधकांचे बळ अधिक प्रबळ होईल, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!