महाराष्ट्र

Navneet Rana :  विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले  

Amravati : अचलपूरात भगवा आत्म्याचा विजय  

Author

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर टीका करत अचलपूरमधील पूर्वीच्या राजकीय नाट्याला टोला लगावला.

महाराष्ट्र दिनाचे पर्व राज्यभर धूमधाम आणि आनंदात पार पडले. मात्र अचलपूरच्या राजकारणात माजी खासदार नवनीत राणा यांची भूमिका पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. नवनीत राणा यांनी अलीकडेच दिलेल्या भाषणात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, अचलपूर मतदारसंघातून पुन्हा कोणीही भगवा काढू शकणार नाही.  त्यांनी थेट नाव न घेता  पक्षाचे नेते बच्चू कडूंवर जोरदार अप्रत्यक्ष टीका केली.

अचलपूर मतदारसंघात पूर्वी नाटकं झाली. कुणी नदीत बसलं, कुणी विहिरीत, कुणी पाण्याच्या टाकीवर. पण आता भगव्या विचारसरणीच्या उमेदवाराची निवड झालेली आहे, असं सांगत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. राणा म्हणाल्या, जेव्हा आम्ही या मतदारसंघात लढायला सुरुवात केली, तेव्हा बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत होते. हे केवळ निवडणूक नव्हती, तर हा आमच्या स्वाभिमानाचा लढा होता. भगव्याचा विजय आमचा विजय आहे.  नवनीत राणा यांनी महिलांच्या राजकीय सहभागावरही भर दिला.

Chandrashekhar Bawankule : नागपूरचं रूपांतर आंतरराष्ट्रीय शहरात होणार   

हिंदूत्वाचा जोर कायम

जेव्हा एक महिला निवडणुकीत उतरते, तेव्हा ती तलवार घेऊन नसली तरी झाशीची राणी असते, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांनी स्पष्ट केलं की अचलपूर मतदारसंघात व्यक्ती गरीब असली तरी चालेल, पण ती प्रामाणिक आणि काम करणारी असावी, अशी जनतेची मागणी होती. आमचे आमदार प्रवीण तायडे यांनी भगवा फडकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, असं त्या म्हणाल्या. प्रवीण तायडे अजूनही स्वतःला लहान समजतात, पण ही लढत केवळ एका उमेदवाराची नव्हती, तर भगव्याच्या आत्म्याची होती. ही निवडणूक नव्हती, हा सन्मान होता भगव्याचा.

नवनीत राणा यांनी काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यावरही निशाणा साधला. ज्याचं नशीब होतं ते केवळ 1 टक्के लोक निवडून आणतात, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की अशा अपयशी प्रतिनिधींनी जनतेला काही दिलं नाही. नवनीत राणा यांनी धार्मिक सूर पकडत म्हटलं, जोपर्यंत देशात हिंदू शब्द आहे, तोपर्यंत अचलपूरमधून कोणीही भगवा काढू शकत नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भगवा फडकवण्याची जबाबदारी आपली आहे. प्रवीण तायडे यांना पाठिंबा देताना नवनीत राणा म्हणाल्या, एक बहीण म्हणून, मी तायडे यांच्या पाठीशी कायम उभी राहीन. ही केवळ निवडणूक नव्हे, ही लढाई आहे अचलपूरच्या तरुणांच्या भविष्यासाठी.

Nagpur : महाराष्ट्र दिनाला काळा दिवस घोषित करत झेंडा फडकवला  

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!