महाराष्ट्र

दुसऱ्यांदा अपघात अन् Tukaram Bidkar यांच्यावर..

चारच महिन्यात दुसऱ्यांदा काळाची झडप, यंदा डाव साधला

Share:

Author

भाजपच्या मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून आपल्या मित्रासोबत गेलेले तुकाराम बिडकर परत येत असताना अकोल्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ट्रकच्या धडकेने मृत्युमुखी पडले. तुकाराम बिरकड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते.

अकोल्यातील प्रसिद्ध राजकीय नेते आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवार, 13 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असलेल्या बिडकर यांनी 2004 मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

राजकारणाबरोबरच त्यांचा मराठी सिनेसृष्टीतही सक्रिय सहभाग होता. त्यांनी झरी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि या माध्यमातूनही आपली प्रतिभा सिध्द केली. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोंदियाच्या मेकओव्हरसाठी Prashant Padole यांची दिल्ली झेप

योगायोग 13 आकड्याचा

तुकाराम बिरकड यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या 2013 मध्ये झाली होती. बिरकड यांना पहिला जबर अपघात झाला, ती तारीख देखील 13 होती. गुरुवारी जेव्हा त्यांना दुसरा अपघात झाला त्यावेळी देखील 13 तारीख होती. तुकाराम बिरकड यांना अकोल्याच्या शिवर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पम्पाजवळ अपघात घडला. शिवरच्या पेट्र्रोल पम्पापासून अकोल्यापर्यंतचे अंतर योगायोगानं 13 मिनिटांचे आहे.

माळी समाजाचे नेतृत्व

माजी आमदार तुकाराम बिरकड हे अकोल्यातील माळी समाजाचं प्रतिनिधित्व करायचे. अकोल्याच्या जिल्हा परिषद राजकारणतही ते सक्रिय होते. ते जिल्हा परिषदेत सभापती देखील होते. जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा क्षेत्रात योगदानही दिलं. अकोल्यापासून जवळ असलेल्या कुंभारी गावात बिरकड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

फिनिक्स मॅरेथॉनमुळे Nagpur ठरणार फिटनेस मध्ये प्रेरणादायी

 

चार महिन्यांपूर्वीही अपघात

गत चार महिन्यांपूर्वी, 13 ऑक्टोबर 2024 रोजी प्रा. तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. ते पांढऱ्या रंगाच्या स्कुटीने प्रवास करत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती, मात्र त्यातून ते लवकरच सावरले होते.

सकाळच्या वेळेत ते आपल्या निवासस्थानाहून अॅक्टिव्हावरून जठारपेठ मार्गे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले होते.. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

भविष्यात Raj Thackeray ठरू शकतात Politics मधील गेम चेंजर

विश्वासू सहकाऱ्याची हत्या

प्रा. तुकाराम बिडकर यांचे निकटवर्तीय आणि खासगी स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर श्रीकृष्ण वानखडे यांची 11 वर्षांपूर्वी भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा थरारक प्रकार 9 नोव्हेंबर 2013 रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडला. बिडकर यांच्या कार्यालयाच्या बाहेरच ज्ञानेश्वर वानखडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

या प्रकरणात शैलेश राठोड नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, शैलेश राठोड आणि त्याचा भाचा यशपाल जाधव यांनी ज्ञानेश्वर वानखडे यांच्यासोबत बिडकर यांच्या कार्यालयातच मोठा वाद घातला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त राठोड आणि जाधव यांनी ज्ञानेश्वर वानखडेंवर धारदार कत्ता आणि लोखंडी पाइपने हल्ला केला. त्यांच्या डोके आणि मानेवर जबर मार लागल्याने ते काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील श्रमिक Maharashtra Budget मुळे तणावात

हत्येमागील कट

पोलिसांनी तपासादरम्यान हत्येच्या कारणांचा शोध घेतला असता, शैलेश राठोडला काही वेळा अवमानास्पद वागणूक मिळाल्याचे आढळले. त्यातूनच त्याने वानखडेंशी वाद घातला आणि प्राणघातक हल्ला केला. ज्ञानेश्वर वानखडे हे केवळ तुकाराम बिडकर यांचे सहकारीच नव्हते, तर त्यांच्या कुटुंबातील विश्वासू सदस्यासारखेच होते. त्यांच्या हत्येमुळे बिडकर यांना मोठा धक्का बसला होता.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!