महाराष्ट्र

नागनदीच्या पात्रात अतिक्रमणाचा कहर; Nagpur प्रशासनाचे दुर्लक्ष

पुरस्थिती कायम राहण्याची भीती; 

Author

नागपुरातील नाग नदीच्या पात्रात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अडचण निर्माण होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

नागनदीच्या दोन्ही बाजूने गेल्या दहा वर्षांत दुप्पट प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, त्यामुळे नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रशासन याकडे सातत्याने कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

धंतोली झोन कार्यालयासमोरील रेल्वे पूलाजवळ काही नागरिकांनी नागनदीच्या पात्रात घरे बांधली आहेत. ज्यामुळे नदीचा प्रवाह अरुंद झाला आहे. मध्य रेल्वेने येथे दुरुस्तीचे काम सुरू केल्याने नदीच्या एका बाजूने पर्यायी मार्ग तयार केला आहे. तर दुसऱ्या बाजूने पाणी वाहत आहे. मात्र, एका बाजूने पूर्णतः अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.

मुंडे – धस Hospital मध्ये भेटले, बंद दाराआड Operation ठरले

धोक्याची शक्यता 

धंतोली झोन कार्यालयासमोरील रेल्वे पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असले तरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास मोठ्या पुराचा धोका कायम राहील. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अंबाझरी तलाव परिसर, धरमपेठ, गांधीनगर, सीताबर्डी आणि धंतोली भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नागनदीवरील अतिक्रमणामुळे यंदाही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंबाझरी ते सीताबर्डी दरम्यानच्या नागनदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पुरामुळे अनेक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात अंबाझरी परिसरातील नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. नागनदीच्या पात्रात मोक्षधाम घाटासाठी सिमेंट कॉलम टाकून बांधकाम करण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला दुकानदारांचे अतिक्रमण अनेक वर्षांपासून कायम आहे. हे अतिक्रमण न हटविल्यास नागनदीचा प्रवाह सुरळीत होणार नाही आणि पूरस्थिती कायम राहील.

कारवाई फक्त कागदावर?

नागनदीसह पिली नदी आणि पोहरा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासन फक्त कागदोपत्री कारवाई करत आहे. प्रारंभी काही झोपडपट्ट्या आणि अनधिकृत बांधकामे हटवली जातात, मात्र काही दिवसांत जैसे थे स्थिती निर्माण होते.

लवकरात लवकर नागनदीवरील अतिक्रमण काढले नाही, तर काही वर्षांत नागनदी अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या समस्येवर गंभीर पावले उचलली नाहीत, तर नागपूरकरांना दरवर्षी पूरस्थितीला सामोरे जावे लागेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!