महाराष्ट्र

Nitin Gadkari : शिर्डी महामार्गाच्या भूमिपूजनाला मला बोलवू नका

Maharashtra : विकासाचा ध्यास असणाऱ्या नितीन गडकरींची असहायता

Author

नितीन गडकरी यांनी शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पावर नाराजी व्यक्त करत मलाच लाज वाटते, अशी खंत मांडली. चौथ्यांदा टेंडर पूर्ण होऊनही काम सुरू न झाल्याने ते व्यथित झाले.

अहिल्यानगर ते शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट व तीव्र शब्दांत आपली खंत व्यक्त करताना सांगितले की, या महामार्गाच्या भूमिपूजनासाठी आता त्यांना बोलवूच नये, कारण या रखडलेल्या प्रकल्पामुळे आता मलाच लाज वाटते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळा ठरणाऱ्या ठेकेदारांवरही रोष व्यक्त केला.

नगर-शिर्डी महामार्गाचे चार वेळा टेंडर काढूनही काम सुरू न होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. टेंडर मिळाल्यानंतर काम न करणाऱ्या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांची बँक गॅरंटी देखील जप्त करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एवढ्या वेळा टेंडर प्रक्रिया होऊनही काम न सुरू होणे ही बाब जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी असल्याचे गडकरींच्या स्वरातून उमटले.

Maharashtra : पिक विमा नव्या रूपात, संकटावर शेतकऱ्यांची विजयी हाक 

प्रगतीसाठी ठोस पावले

गडकरी यांच्या हस्ते नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्ते विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नांदूर शिंगोटी ते कोल्हार हा 47 किलोमीटर लांबीचा रस्ता 326 कोटी रुपये खर्चून सुधारण्यात येणार आहे. तसेच नगर – सबलखेड – आष्टी – चिंचपूर हा 50 किलोमीटर रस्ता 750 कोटी रुपयांमध्ये उभारण्यात येणार आहे. बेल्हे – अळकुटी – निघोज – शिरूर या मार्गाच्या सुधारणेसाठी 390 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सर्व प्रकल्प सुरत ते चेन्नई महामार्गाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेगाने घडणार आहे. केंद्रीय कॅबिनेटची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कामांना गती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असतील त्या बदल्यात त्यांना लवकरच मोबदला दिला जाईल असे आश्वासनही गडकरी यांनी दिले.

Prashant Padole : शेतकऱ्यांच्या आशा सरकारने पायदळी तुडवल्या

जबाबदारीचा आग्रह

गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, उत्तम आणि जबाबदार ठेकेदार मिळणे त्यांच्या हातात नसले तरी देखील पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणीसाठी त्यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे. चार वेळा रद्द झालेले टेंडर हे केवळ व्यवस्थेतील कमकुवतपणाचे लक्षण नाही. तर देशात रस्ते विकासासाठी असलेल्या राजकीय इच्छाशक्तीची कसोटीही आहे. नितीन गडकरी यांनी घेतलेली ही भूमिका केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या भूमिकेतून होती. त्यांच्या अशा स्पष्ट वक्तव्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणा आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षावर ठाम प्रहार झाला आहे.

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनावेळी बोलताना गडकरी यांच्या शब्दांमधून एक जबाबदार नेतृत्वाची वेदना उमटत होती. रस्ते विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात प्रामाणिकपणा आणि तळमळ दिसून आली. महामार्ग विकास हे केवळ बांधकामाचे काम नाही. त्यामागे जनतेच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्याचा मोठा हेतू असल्याची जाणीव त्यांच्या भाषणातून ठळकपणे समोर आली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!