
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. शहीद जवानांच्या बलिदानाने जनतेच्या मनात असंतोष खदखदतोय. या संतापाचे रूप आता निर्णायक लढाईच्या दिशेने वळताना दिसत आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या सातत्यपूर्ण दहशतवादी कारवाया आणि त्यामागील असहकारभावनेने भारलेली विधाने हे संबंध अधिकच तणावपूर्ण करत आहेत.
भारताच्या अस्मितेला दिलेलं हे थेट आव्हान मानून भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेल्या विधानाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याने केंद्र सरकारच्या पुढील पावलांची दिशा स्पष्ट होऊ लागली आहे.

Pahalgam Attack : बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हद्दीत, रेंजर्सकडून ताब्यात
लढाईचा बुलंद रणघोष
डॉ. परिणय फुके यांनी केलेले विधान जनतेच्या मनातील आवाज ठरत आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आता वेळ आली आहे अंतिम स्ट्राईकची. आता सर्जिकल नव्हे तर आऊटरेक स्ट्राईक होणार. या विधानाने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाईसाठी देश सज्ज झाल्याचे संकेत मिळाले आहेत. डॉ. परिणय फुके यांचे हे भाष्य 130 कोटी भारतीयांची भावना आहे, असा सूर सध्या सर्वत्र दिसतोय. डॉ. परिणय फुके यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सर्व पातळ्यांवर रोखून धरले. परराष्ट्र धोरणांपासून सीमारेषेवरील संरक्षण व्यवस्थांपर्यंत सर्वच पातळ्यांवर भारताने आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली. डॉ. परिणय फुके यांनी यावर ठामपणे सांगितले की, आता फक्त पीओके (पाकव्याप्त काश्मीर) भारतात यायला हवा आणि हा मुद्दा कोणत्याही किंमतीवर मागे टाकता कामा नये.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घेतलेला सिंधू नदीच्या पाणी कराराचा निर्णय हा एक मोठा धोरणात्मक पाऊल ठरतोय. डॉ. परिणय फुके यांनी या निर्णयाचं समर्थन करत, हे पाऊल फक्त जलनीतीचं नव्हे तर राष्ट्रीय अस्मितेचं असल्याचं स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली आणि भारतविरोधी निर्णयांची मालिका सुरू केली आहे. हाफिज सईदसारख्या दहशतवादी प्रवक्त्यांचा धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे वातावरण अधिक गडद होत आहे. डॉ. परिणय फुके यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, हे सर्व प्रकार भारताच्या निर्णायक प्रतिक्रियेची मागणी करत आहेत. आता मागे हटण्याचा काळ नाही, तर निर्णायक कृतीचा काळ आहे.
भीतीचे वातावरण
भारताच्या या निर्णयांनी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तातडीने तोडले आहेत. भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हे सर्व निर्णय भारताच्या दबावामुळे घेतले गेले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. डॉ. परिणय फुके यांची भूमिका या सगळ्या घडामोडींमध्ये केवळ राजकीय नेत्याची नाही. तर ती एक राष्ट्रवादी विचारसरणीची भूमिका आहे. त्यांनी जो बुलंद आवाज दिला आहे, तो संपूर्ण जनतेच्या मनात पेटलेली राष्ट्रभक्तीची मशाल ठरतोय. त्यांच्या विधानाने केवळ विरोधकांना नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही भारताची भूमिका अधिक ठामपणे उभी राहत आहे.
Anil Deshmukh : नळगंगा वैनगंगा प्रकल्पात संत्रा पट्टीला पाण्याचा हक्क द्या